शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दीड महिन्यातच दूरगावचा तलाव कोरडाठाक; शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:02 IST

गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतीसाठी सोडण्यात आलेल्या कुकडीच्या आवर्तनातून कर्जत तालुक्यातील दुरगाव तलाव सुमारे ८० टक्के भरला होता. परंतु या तलावामधील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात नियमित उपसा होत असल्याने अवघ्या काही दिवसातच हा पाझर तलाव कोरडाठाक पडला आहे.

कुळधरण : गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतीसाठी सोडण्यात आलेल्या कुकडीच्या आवर्तनातून कर्जत तालुक्यातील दुरगाव तलाव सुमारे ८० टक्के भरला होता. परंतु या तलावामधील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात नियमित उपसा होत असल्याने अवघ्या काही दिवसातच हा पाझर तलाव कोरडाठाक पडला आहे.

   सध्या दूरगावच्या तलावात पाण्याचा एक थेंब ही दिसत नाही. यावर अवलंबून असलेली शेती धोक्यात आली आहे. दुरगाव व कुळधरण परिसरातील एकूण तेराशे एकरावरील शेतीचे क्षेत्र या तलावामुळे ओलिताखाली येते. 

    पूर्वी या तलावावर ओलिताखालील खूप कमी क्षेत्र होते. यामुळे हा जलाशय आटत नव्हता. मात्र आता या तलावखालील ओलिताखाली क्षेत्र वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीसाठी उपसा होते. त्यामुळे यंदा हा तलाव कोरडाठाक पडला आहे. 

   ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तलाव कोरडा पडल्याने पिके सुकू लागली आहेत. कुकडीचे आवर्तन अजूनही सुटले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तरी कुकडीच्या आवर्तनातून दूरगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरुन द्यावा, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणWaterपाणीKarjatकर्जत