शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीला दररोज १७ एमएलटी पाणी

By admin | Updated: June 17, 2014 00:36 IST

अहमदनगर : औद्योगिक वसाहतीतील उद्योगांसाठी दररोज १७ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरविले जाणारे पाणी पुरेसे नाही़

अहमदनगर : औद्योगिक वसाहतीतील उद्योगांसाठी दररोज १७ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरविले जाणारे पाणी पुरेसे नाही़ पाणी पुरत नसल्याने पाणीपुरवठ्यात वाढ करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे़ परंतु जुनाट जलवाहिनीमुळे पुरेसे पाणी पुरविण्याचे मोठे आव्हान औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर आहे़नागापूर औद्योगिक वसाहतीला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो़ उद्योगांसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ जलवाहिनी टाकताना परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणे महामंडळावर बंधनकारक करण्यात आले आहे़ त्यामुळे परिसरातील नवनागापूर, इसळक, निंबळक, खारे-खर्जूने, वडगाव गुप्ता ग्रामंपचायतींना याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो़ या गावांना जवळपास २ दशलक्ष लीटर पाणी लागते़ याशिवाय सुपा एमआयडीसीलाही पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे उद्योजकांसह परिसरातील ग्रामस्थही पिण्याच्या पाण्यासाठी या जलवाहिनीवर अवलंबून आहेत़ परंतु जलवाहिनी जुनाट झाल्यामुळे गळती लागण्याचे प्रकार वाढले असून, पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीत एक हजार ३५० नळजोड आहेत़ या नळांना चोवीसतास मीटरव्दारे पाणी दिले जाते़ उद्योजकांनी स्वखर्चाने मीटर बसवून घेतले आहे़ उद्योजकांना एक हजार लीटर पाण्यासाठी २५ रुपयांची पाणीपट्टी भरावी लागते़ मात्र पाणीपुरवठा सुरळीत नाही़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे़ पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नसल्याने उद्योजकांत नाराजी पसरली आहे़ महामंडळाने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम ठेकेदारास दिले होते़ परंतु परिसरातील शेतकऱ्यांकडून काम बंद पाडण्यात आले़ त्यामुळे जलवाहिनीचे काम रखडले असून, त्यास अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही़ (प्रतिनिधी)वादळी वाऱ्यासह पावसामुळे पडझड होऊन विद्युतपुरवठा खंडीत झाला़ तो सुरळीत झाला आणि पुन्हा जलवाहिनी फुटली़ ती दुरुस्त करण्यात आली असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़- वि़ प़ खांदवे, पाणीपुरवठा विभागप्रमुख,एमआयडीसीकाही भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे़ मात्र काही भागात पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत़ कामगारांना पिण्यासाठी पाणी नाही़ त्यामुळे टँकरचे पाणी घ्यावे लागते़- राजेंद्र कटारिया, उद्योजक