शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

मुख्यमंत्री जनता ठरवेल, महाराष्ट्र कुणाचीही जहागिरी नाही; अमोल कोल्हेंची सेना-भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 12:46 IST

भाजप आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या यात्रा सुरु आहेत. मुख्यमंत्री कोण व्हावा यासाठी त्यांची लढाई सुरु आहे.

अहमदनगर: भाजप आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या यात्रा सुरु आहेत. मुख्यमंत्री कोण व्हावा यासाठी त्यांची लढाई सुरु आहे. मुख्यमंत्री जनतेला ठरवू द्या. महाराष्ट्र कुणाचीही जहागिरी नाही, असे मत डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला अहमदनगरमधून सुरुवात झाली. या यात्रेच्या शुभारंभावेळी डॉ.कोल्हे बोलत होते.

कोल्हे म्हणाले, दुष्काळ व पुरग्रस्त यांना मदत न करता मुख्यमंत्री आणि शिवसेनेकडून यात्रा काढत आहेत. या यात्रा केवळ निवडणुकीसाठी काढल्या आहेत. सरकारने गेल्या पाच वर्षात काय काम केले, असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. जम्मू काश्मीरच्या निर्णयाला आमचा विरोध नाही. या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. लोकशाहीमध्ये असे निर्णय घेणे घातक आहे. जीएसटी लागू केल्यानंतर दहशतवाद पुर्णपणे संपला असे सरकार म्हणत होते. पण खरोखरच दहशतवाद संपलाय का ? एव्हीएमबाबत सर्वांनाच संभ्रम आहे.

संग्राम जगताप यांची लोकसभेवेळीची रॅली आणि मिळालेली मते यामध्ये फरक का दिसतोय ? सर्वसामान्य जनतेला देखील संशय आहे. मग सर्वांनाच संभ्रम आहे तर मग सरकारने बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला काय हरकत आहे. राष्ट्रवादीतील पडझडीबद्दल कोल्हे म्हणाले, पवार साहेबांच्या विचारांवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. वरची वीट ढासळली म्हणून खालची वीट ढासळत नाही. नेते गेले असले तरी कार्यकर्ते पक्षातच आहेत आणि त्यांचा पक्षावर विश्वास आहे. एकेकाळी राष्ट्रवादीत फक्त सहाच आमदार होते. त्याचे ६० झाले हा इतिहास आहे. मग कोणीही सोडून गेले त्याने फरक पडत नाही. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीचे सरकार नक्की येईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस