शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या मनात महाराष्ट्रासाठी जागा, विकासासाठी डबल इंजिन सरकार गरजेचे: जे. पी. नड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2024 13:26 IST

शिर्डीच्या या पवित्र भूमीत साईबाबांनी 'सबका मालिक एक'चा संदेश दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल विशेष जागा आहे. त्यामुळे हे राज्य पुढे नेण्यासाठी व येथे सुरू असलेले प्रकल्प आणखी गतीने होण्यासाठी महायुतीचे डबल इंजिन सरकार गरजेचे आहे, असा आशावाद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी शिर्डीत व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ शिडी येथे बुधवारी (दि.१३) झालेल्या सभेत मंत्री नड्डा बोलत होते.

यावेळी उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कमलाकर कोते, राजेंद्र गोंदकर, सुरेंद्र थोरात आदींसह महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

शिर्डीच्या या पवित्र भूमीत साईबाबांनी 'सबका मालिक एक'चा संदेश दिला. त्याचप्रमाणे 'सबका साथ, सबका विकास' हा नारा देत मोदी सरकार गतीने पुढे चालले आहे. स्वातंत्र्यापासून जेवढे सत्ताधारी आले त्यांनी भ्रष्टाचारातून स्वतःची घरे भरण्याचे काम केले; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला विकासाच्या वाटेने नेले. कोरोनानंतर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान आदी देश आर्थिक गर्तेत सापडली असताना एकमेव भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे साऱ्या जगाने पाहिले. त्यावेळी जगाचा विकासदर मंदावत असताना भारताचा विकासदर वाढत होता. त्यामुळेच जगात भारताची अर्थव्यवस्था मोदींच्या कार्यकाळात ११व्या स्थानावरून ५व्या स्थानावर आली. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणून तुम्ही मोदींना साथ दिली तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर येण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास मंत्री नड्डा यांनी व्यक्त केला.

राधाकृष्ण विखे म्हणाले, लाडक्या बहिणींसह केंद्राच्या योजना लोकांपर्यंत गेल्या आहेत. आघाडीचे कितीही नेते येऊ द्या, युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी त्यांच्या लाडक्या बहिणी असल्याने आमचा विजय पक्का आहे.

विखे यांनी केलेला विकास उल्लेखनीय : नड्डा 

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या. नवीन औद्योगिकीकरण आणले, निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण केले. ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्पाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील ही त्यांची कामे उल्लेखनीय असल्याने त्यांना पुन्हा विधासभेत पाठवा. केंद्रासह राज्य सरकार शिर्डीच्या विकासावर विशेष भर देईल, अशी ग्वाही मंत्री नड्डा यांनी दिली.

महाआघाडीने विकासाला ब्रेक लावला 

महाआघाडीचे सरकार सत्तेत असताना केंद्राच्या प्रकल्पांना ब्रेक लावण्याचे काम केले. महाराष्ट्राच्या हितासाठी केंद्राने अनेक प्रकल्प दिले, मात्र आघाडी सरकारने सर्व प्रकल्प बंद पाडले. जातीच्या नावाने समाजात, देशात फूट पाडण्याचे पाप विरोधक करत असल्याचा आरोप मंत्री नड्डा यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकshirdi-acशिर्डीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील