शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

मोदींच्या मनात महाराष्ट्रासाठी जागा, विकासासाठी डबल इंजिन सरकार गरजेचे: जे. पी. नड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2024 13:26 IST

शिर्डीच्या या पवित्र भूमीत साईबाबांनी 'सबका मालिक एक'चा संदेश दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल विशेष जागा आहे. त्यामुळे हे राज्य पुढे नेण्यासाठी व येथे सुरू असलेले प्रकल्प आणखी गतीने होण्यासाठी महायुतीचे डबल इंजिन सरकार गरजेचे आहे, असा आशावाद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी शिर्डीत व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ शिडी येथे बुधवारी (दि.१३) झालेल्या सभेत मंत्री नड्डा बोलत होते.

यावेळी उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कमलाकर कोते, राजेंद्र गोंदकर, सुरेंद्र थोरात आदींसह महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

शिर्डीच्या या पवित्र भूमीत साईबाबांनी 'सबका मालिक एक'चा संदेश दिला. त्याचप्रमाणे 'सबका साथ, सबका विकास' हा नारा देत मोदी सरकार गतीने पुढे चालले आहे. स्वातंत्र्यापासून जेवढे सत्ताधारी आले त्यांनी भ्रष्टाचारातून स्वतःची घरे भरण्याचे काम केले; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला विकासाच्या वाटेने नेले. कोरोनानंतर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान आदी देश आर्थिक गर्तेत सापडली असताना एकमेव भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे साऱ्या जगाने पाहिले. त्यावेळी जगाचा विकासदर मंदावत असताना भारताचा विकासदर वाढत होता. त्यामुळेच जगात भारताची अर्थव्यवस्था मोदींच्या कार्यकाळात ११व्या स्थानावरून ५व्या स्थानावर आली. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणून तुम्ही मोदींना साथ दिली तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर येण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास मंत्री नड्डा यांनी व्यक्त केला.

राधाकृष्ण विखे म्हणाले, लाडक्या बहिणींसह केंद्राच्या योजना लोकांपर्यंत गेल्या आहेत. आघाडीचे कितीही नेते येऊ द्या, युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी त्यांच्या लाडक्या बहिणी असल्याने आमचा विजय पक्का आहे.

विखे यांनी केलेला विकास उल्लेखनीय : नड्डा 

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या. नवीन औद्योगिकीकरण आणले, निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण केले. ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्पाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील ही त्यांची कामे उल्लेखनीय असल्याने त्यांना पुन्हा विधासभेत पाठवा. केंद्रासह राज्य सरकार शिर्डीच्या विकासावर विशेष भर देईल, अशी ग्वाही मंत्री नड्डा यांनी दिली.

महाआघाडीने विकासाला ब्रेक लावला 

महाआघाडीचे सरकार सत्तेत असताना केंद्राच्या प्रकल्पांना ब्रेक लावण्याचे काम केले. महाराष्ट्राच्या हितासाठी केंद्राने अनेक प्रकल्प दिले, मात्र आघाडी सरकारने सर्व प्रकल्प बंद पाडले. जातीच्या नावाने समाजात, देशात फूट पाडण्याचे पाप विरोधक करत असल्याचा आरोप मंत्री नड्डा यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकshirdi-acशिर्डीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील