शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

अहिल्यानगरमध्ये २५ वर्षे प्रतिनिधित्व, यंदा उमेदवारच नाही; शिवसैनिकांच्या मनातील खदखद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2024 09:10 IST

शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट झाले असून, एक गट महायुतीमध्ये व दुसरा महाविकास आघाडीमध्ये आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार या मतदारसंघात उभा राहिलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, केडगाव: विधानसभा मतदारसंघाच्या  अहमदनगर शहर निवडणुकीत २५ वर्षे शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रतिनिधित्व केले. परंतु, जागावाटपात यंदा शिवसेनेच्या हातून हा गड राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्याने मतपत्रिकेवरून शिवसेना निवडणूक आखाड्याच्या बाहेर पडली आहे. आघाडीचा धर्म म्हणून शिवसैनिक प्रचारात उतरतीलही; पण उद्धवसेना निवडणुकीत नसल्याची खदखद शिवसैनिकांच्या मनात कायम राहील.

शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट झाले असून, एक गट महायुतीमध्ये व दुसरा महाविकास आघाडीमध्ये सोबत आहे. महायुतीमध्ये नगर शहर मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेलेला आहे तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेला आहे. त्यामुळे या वेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार या मतदारसंघात उभा राहिलेला नाही.

नगर शहर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मानला जात होता. शिवसेना उपनेते दिवगंत अनिल राठोड यांनी १९९०, १९९५, १९९९, २००४, २००९ अशा सलग पाच वेळा या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला. त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा गाजायच्या.

यापूर्वी नगर शहरात चार वेळा काँग्रेसने, एकदा जनता पक्षाने विजय मिळविला होता. मात्र त्यांनतर मतदारसंघात शिवसेनेच्या वादळापुढे १९९०च्या विधानसभा निवडणुकीपासून २००९ पर्यंत काँग्रेस व इतर पक्ष भुईसपाट झाले. महापालिकेतही शिवसेनेचेच वर्चस्व राहिले. सर्वाधिक नगरसेवक व सर्वाधिक महापौर शिवसेनेच्या नावावर आहेत.

नगर शहर मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेला. यामुळे शिंदेसेनेलाही येथे दावा करता आला नाही. कारण, या मतदारसंघात राष्ट्रवादीचा गेल्या १० वर्षांपासून आमदार आहे. त्यात उद्धवसेनेकडून मोठा दावा असतानाही उमेदवारी न मिळाल्याने उद्धवसेनेतील पदाधिकारी, शिवसैनिकांत नाराजीचा सूर आहे. असे असले तरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाआघाडीचा धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा दिला. मात्र, २५ वर्षांपासूनच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात प्रथमच शिवसेना पक्ष नसल्याची खदखद शिवसैनिकांच्या मनात कायम आहे.

जिल्ह्यात सेनेची सर्वाधिक ताकद नगरमध्येच

शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड हे शहराच्या राजकारणात शिवसेनेचे वर्चस्व टिकवून सतत प्रयत्नशील होते. महापालिकेतही शिवसेनेचा दबदबा आहे. मात्र, २०१४ पासून शिवसेनेला येथे दोनदा पराभवाचा सामना करावा लागला होता. तरीही नगर शहरावर शिवसेनेची पकड मजबूत होती. मात्र, आता शहर मतदारसंघात हा पक्षच मैदानात राहिला नाही.

पारनेरमधूनही शिवसेना मैदानात नाही

नगर शहर मतदारसंघानंतर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद पारनेर मतदारसंघात आहे. या मतदारसंघातून २००४, २००९, २०१४ अशा सलग तीनदा शिवसेनेने येथे वर्चस्व सिद्ध केले. २०१९ मध्ये शिवसेनेचा येथे पराभव झाला. यंदा मात्र हा पक्षच निवडणुकीत उतरला नाही. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAhilyanagarअहिल्यानगरAhmednagarअहमदनगरShiv Senaशिवसेना