शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

दुष्काळी संगमनेर तालुका आता राज्यात सर्वाधिक प्रगत बनला: सत्यजित तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2024 09:24 IST

घुलेवाडी, राजापूर येथील नागरिकांशी संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : सुमारे ४० वर्षांपूर्वी दुष्काळी असलेला संगमनेर तालुका आता राज्यात सर्वाधिक प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले.

आमदार तांबे यांनी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी, राजापूर येथील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत, पंचायत समितीचे माजी सभापती नवनाथ अरगडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले, अनेक लाटा आल्या आणि गेल्या. मात्र, संगमनेर तालुक्यातील जनता आमदार बाळासाहेब थोरात यांच्याच पाठीशी उभी आहे. संगमनेर तालुक्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्यावेळी आमदार थोरात हे जनतेच्या मदतीला उभे राहिले. मग ते कोरोनाचे संकट असो अथवा पूर परिस्थिती असेल, अशा सगळ्याच परिस्थितीमध्ये आमदार थोरात कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका बजावत होते, संपूर्ण संगमनेर तालुक्याला आमदार थोरात यांनी विकासातून वैभवाकडे नेले. १७१ गावे, २५८ वाड्यावस्त्या असलेला संगमनेर तालुका ११० किलोमीटर लांबीचा असून येथे सातत्याने विकासकामे सुरू असतात. सहकार, शिक्षण, शेती, ग्रामीण विकास यामाध्यमातून तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे, असे तांबे म्हणाले.

बाह्य शक्तीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला 

बाह्य शक्त्तीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु खालच्या पातळीवर जेव्हा टीका झाली, तेव्हा संगमनेर तालुक्यातील नागरिक एकवटले आणि तालुक्याची अस्मिता जागी झाली. विधानसभा निवडणुकीतून संगमनेर तालुक्यातून विक्रमी मताधिक्याचे मापदंड निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने काम करावे. बाह्यशक्त्तीसह अनेकांनी तालुक्याच्या अस्मितेला डिवचण्याचा जेव्हा प्रयत्न केला. तेव्हा तालुका एकवटला आहे, असेही आमदार तांबे म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAhilyanagarअहिल्यानगरsangamner-acसंगमनेरSatyajit Tambeसत्यजित तांबे