अगस्ती कारखाना करणार पावणेचार लाख टन उसाचे गाळप
By Admin | Updated: October 12, 2016 01:05 IST2016-10-12T00:31:03+5:302016-10-12T01:05:48+5:30
अकोले : अगस्ती साखर कारखान्याला कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढीसाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करील, तसेच ‘इथेनॉल’ सहनिमिर्ती प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल,

अगस्ती कारखाना करणार पावणेचार लाख टन उसाचे गाळप
अकोले : अगस्ती साखर कारखान्याला कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढीसाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करील, तसेच ‘इथेनॉल’ सहनिमिर्ती प्रकल्प वर्षभरात पूर्ण होईल, अशी ग्वाही देत या गळीत हंगामात पावणे चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा मनोदय जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी व्यक्त केला.
अगस्ती साखर कारखान्याचा २३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवारी विजया दशमीला कळसेश्वर देवस्थानचे सुभाषपुरी महाराज, तसेच योगी केशवबाबा यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकर पिचड होते.
गत वर्षी प्रतिकूल परिस्थितीत गळीत हंगाम यशस्वी केला. कार्यक्षेत्रात ऊसवाढीसाठी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ प्रयत्न करत आहेत. कार्यक्षेत्रात पावणे दोन लाख मेट्रिक टन ऊस असून, कार्यक्षेत्राबाहेरील उसाच्या बळावर यंदा किमान साडेतीन ते पावणे चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा आराखडा तयार आहे. १३ संचालकांनी आपल्या डोक्यावर वैयक्तिक कर्ज घेऊन कारखान्याची चिमणी पेटती ठेवल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी स्पष्ट केले.
ऊसउत्पादक शेतकरी व कामगारांनी २३वा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री पिचड यांनी केले. आमदार वैभव पिचड, जेष्ठ नेते लक्ष्मण शिंदे, झुंबरराव आरोटे, जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, पंचायत समिती सभापती अंजना बोंबले, परबत नाईकवाडी, गोरक्ष मालुंजकर, मीनानाथ पांडे, शिवाजी हासे, सुभाष देशमुख, कार्यकारी संचालक भास्कर घुले, शिवाजी कोठवळ आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.
संचालक मच्छिंद्र धुमाळ, बाळासाहेब देशमुख, सुरेश गडाख, भास्कर बिन्नर, सुनील दातीर, संचालिका मनीषा येवले यांनी व राजकुमार पवार यांनी बॉयलरचे पूजन केले. एकनाथ शेळके यांनी सुत्रसंचालन करत उपस्थितांचे आभार मानले.
(तालुका प्रतिनिधी)