शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 11:34 IST

कोपरगाव शहरासह तालुक्यात बुधवारी ( दि.२५ मार्च) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  सर्वदूर विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 कोपरगाव : कोपरगाव शहरासह तालुक्यात बुधवारी ( दि.२५ मार्च) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  सर्वदूर विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.      कोपरगाव तालुक्यातील सर्व गावात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरवात झाली. काही गावात तुरळक तर पूर्व भागातील सर्वच गावात तब्बल दोन तास वादळीवा-यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील उभ्या तसेच सोंगणी केलेल्या गहू, हरभरा, कांदा, पिकांचे व डाळिंबासह इतर फळबागांच नुकसान झाले. याशिवाय जनावरांसाठी साठवणूक केलेला ज्वारी, मक्याचा कोरडा चा-याचे नुकसान झाले. बुधवारी पाऊस सुरु झाल्यानंतर कोपरगाव येथील वीज केंद्रावर बिघाड झाल्याने शहरात रात्री साडेदहा वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र ग्रामीण भागातील वारी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राला कोपरगावहून विद्युत पुरवठा करणारा सवंत्सर येथे वीजवाहक तारांचा खांब वादळात पडला आहे. यामुळे वारी, कान्हेगाव या गावांचा वीज पुरवठा अद्यापपर्यंत खंडित आहे.    दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी रात्रीच दखल घेत तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधून शेतक-यांच्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. या आस्मानी संकटाने शेतकºयांनी खचून न जाता धीर धरावा. शासन आपल्याबरोबर आहे, असे आवाहन केले आहे. मात्र अचानक आलेल्या या अस्मानी संकटाने शेतकरी पूर्णत: मेटाकुटीला आला आहे.    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरkopargaon-acकोपरगांवRainपाऊस