शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 11:34 IST

कोपरगाव शहरासह तालुक्यात बुधवारी ( दि.२५ मार्च) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  सर्वदूर विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 कोपरगाव : कोपरगाव शहरासह तालुक्यात बुधवारी ( दि.२५ मार्च) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास  सर्वदूर विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.      कोपरगाव तालुक्यातील सर्व गावात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरवात झाली. काही गावात तुरळक तर पूर्व भागातील सर्वच गावात तब्बल दोन तास वादळीवा-यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील उभ्या तसेच सोंगणी केलेल्या गहू, हरभरा, कांदा, पिकांचे व डाळिंबासह इतर फळबागांच नुकसान झाले. याशिवाय जनावरांसाठी साठवणूक केलेला ज्वारी, मक्याचा कोरडा चा-याचे नुकसान झाले. बुधवारी पाऊस सुरु झाल्यानंतर कोपरगाव येथील वीज केंद्रावर बिघाड झाल्याने शहरात रात्री साडेदहा वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र ग्रामीण भागातील वारी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राला कोपरगावहून विद्युत पुरवठा करणारा सवंत्सर येथे वीजवाहक तारांचा खांब वादळात पडला आहे. यामुळे वारी, कान्हेगाव या गावांचा वीज पुरवठा अद्यापपर्यंत खंडित आहे.    दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी रात्रीच दखल घेत तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधून शेतक-यांच्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. या आस्मानी संकटाने शेतकºयांनी खचून न जाता धीर धरावा. शासन आपल्याबरोबर आहे, असे आवाहन केले आहे. मात्र अचानक आलेल्या या अस्मानी संकटाने शेतकरी पूर्णत: मेटाकुटीला आला आहे.    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरkopargaon-acकोपरगांवRainपाऊस