शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बाजार समितीत भुसार मालात शेतक-यांची होतेय लूट; क्विंटलमागे एक किलोचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:40 IST

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच भुसार माल विक्रीसाठी आणल्यानंतर नियमानुसार अधिकृत काटा पावतीनुसार पक्की पट्टी तयार होते. त्यानंतर व्यापा-यामार्फत क्विंटलमागे एक किलोचा छुप्या पद्धतीने काटला (वजन कपात करणे) केला जातो. त्याच पावतीच्या मागील बाजूवर काटला व वाराईची रक्कम वजा केली जाते. या माध्यमातून शेतक-यांची लूट होत असून बाजार समिती प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

रोहित टेके । 

कोपरगाव :  कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच भुसार माल विक्रीसाठी आणल्यानंतर नियमानुसार अधिकृत काटा पावतीनुसार पक्की पट्टी तयार होते. त्यानंतर व्यापा-यामार्फत क्विंटलमागे एक किलोचा छुप्या पद्धतीने काटला (वजन कपात करणे) केला जातो. त्याच पावतीच्या मागील बाजूवर काटला व वाराईची रक्कम वजा केली जाते. या माध्यमातून शेतक-यांची लूट होत असून बाजार समिती प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

शेतक-यांना दिलेल्या अधिकृत पावतीतून अनधिकृत लुटीच्या अन्यायावर बाजार समितीचे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे बाजार समिती नेमकी कुणाची ? असा प्रश्न या निमिताने शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे. 

 कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार, कांदा, भाजीपाला व डाळिंब या शेतमालाची खरेदी विक्री होते. भुसारासाठी १८, कांद्यासाठी २२, भाजीपाल्यासाठी ९ व डाळिंबासाठी ७ असे परवानाधारक व्यापारी आहेत. 

शेतमालाच्या लिलावानंतर वजन करण्यासाठी व्यापा-याच्या शेडमध्ये वजन काटे व बाजार समितीचा भुईकाटा आहे. माझ्या सोयाबीनची बाजार समितीच्या भुईकाट्यावर वजन करून व्यापा-याकडे पट्टी बनविण्यासाठी गेलो. भुईकाट्यानुसार माझी सोयाबीन १९.९१ क्विंटलची पावती बनविली. त्यात पावतीच्या मागील बाजूस १९.९१ किलो वजन कपात केली. मी विरोध केला. तसेच सभापती यांच्याशी संपर्क साधला. तरीही उपयोग झाला नाही. त्यानंतर वजन कपातीचे ७०७ रुपये व वाराईचे ८० रुपये एकूण ७८७ रुपये व्यापा-याने कमी दिले आहे. त्यामुळे शेतक-यांची व्यापा-यांकडून लूट होत असताना बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचा शेतक-यांसाठी काहीही उपयोग नाही. -राजेंद्र मलिक, शेतकरी

बाजार समितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतमालाची वजन कपात केला जात नाही. कोणाची लेखी तक्रार आली तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल.-परसराम सिनगर, सचिव, बाजार समिती, कोपरगाव.

शेतक-यांच्या भुसार मालाच्या वजनातून कोणत्याही प्रकारचा काटला काढला जात नाही. शेतक-यांना पट्टी दिली जाते. त्यात सर्व काही नमूद असते. - सुनीलकुमार कोठारी, भुसार मालाचे व्यापारी, कोपरगाव

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी