शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'भाजपासोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल', शरद पवारांनी अजितदादांचा दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 11:00 IST

Sharad Pawar : खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा फेटाळून लावला.

Sharad Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये पहाटे घेतलेल्या शपथविधीची चर्चा आजही राजकीय वर्तुळात सुरू असते.  काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला. 'पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांच्यासह आमची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती, यावेळी आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, ऐनवेळी शरद पवार यांनी शब्द फिरवला. मी मात्र अमित शाह यांना दिलेला शब्द पाळला, यामुळे पहाटेचा शपथविधी झाला',असा दावा अजित पवार यांनी काल केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या.  या दाव्याला आता खासदार शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

"फडणवीस म्हणाले होते, आदित्य ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणून 'घडवेन' अन् दिल्लीला जाईन"; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

'भाजपासोबत जायला आम्हा लोकांची कधीच संमती नव्हती आणि राहणार नाही', असं सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांचा दावा फेटाळून लावला. काल अजित पवार यांनी एका सभेत बोलताना पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा दावा केला होता. अजित पवार म्हणाले होते की, २०१९ च्या निवडणूक निकालानंतर राज्यात सत्तास्थापन होण्यापूर्वी आमची एका बड्या उद्योगपतींच्या घरी अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत खातेवाटपही झाले होते. यावेळी प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीसही सोबत होते. पण, शरद पवार मुंबईत आल्यानंतर त्यांनी शब्द फिरवला. मी शब्द पाळणारा आहे, मला अमित शाह यांचा फोन आला, त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली', असंही अजित पवार म्हणाले होते. 

'जागावाटपावरुन मतभेद होत असतात'

  शरद पवार म्हणाले, इंडिया आघाडी निवडणूक झाल्यानंतर एकत्र बसू आणि पर्याय देऊ, काही ठिकाणी जागेवरुन मतभेद होत असतात.पण, मतभेदाकडे लक्ष द्यायच नाही.निवडणूक लढवायची, जागा जिंकायची आणि जिंकल्यानंतर एकत्र बसून पर्याय द्यायचा. त्यावेळी आम्हाला कोणालाही पुढं करता येईल आणि स्थिर सरकार शक्य आहे, असंही शरद पवार म्हणाले. 

'आजपर्यंत ईडीचा गैरवापर झाला नाही' 

ईडी कारवाईवर बोलताना शरद पवार म्हणाले, आजपर्यंत ईडीचा एवढा गैरवापर झाला नाही. देशातील दोन राज्यातील मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. ईडीचा वापर करुन त्यांना आत टाकलं आहे. ईडीचा गैरवापर अमित शाह आणि त्यांच्या पक्षाने केला आहे, असा आरोपही खासदार शरद पवार यांनी केला.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४baramati-pcबारामती