शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोमात राहण्यापेक्षा आमच्यासोबत या : प्रकाश आंबेडकरांचे आघाडीला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:42 IST

काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या चौकशा लावून त्यांना कोमात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़ त्यासाठी चौकशीचे उंदीर बाहेर काढत आहे,

अहमदनगर : काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या चौकशा लावून त्यांना कोमात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़ त्यासाठी चौकशीचे उंदीर बाहेर काढत आहे, असे सांगून वंचित बहुजन आघाडीसोबत आल्यास तुमचा कोमा कायचा काढून टाकू, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नगर येथे केले़वंचित बहुजन आघाडीच्या येथील क्लेराब्रुस मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते़ यावेळी लक्ष्मन माने, किसन चव्हाण, अरुण जाधव, किसन चव्हाण आदी उपस्थित होते़ भाजपसह काँग्रेस आघाडीवर आंबेडकर यांनी जोरदार टीका केली़ ते म्हणाले, देशभरातील वंचितांची मूठ बांधण्याचे काम सुरू केले़ त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे़ काहीजण सांगतायेत की बहुजन वंचित आघाडीला भाजपाचा छुपा पाठिंबा आहे़ सत्तेसाठी भाजपची ही खेळी आहे, पण मी त्यांना सांगून इच्छितो की, आम्ही कधी आरएसएसच्या नेत्यांबरोबर बसलो नाही़ परंतु तुम्ही सत्तेसाठी कुणासोबतही जायला तयार आहात़पंतप्रधान नरेंद्र मोदी जस-जशी निवडणूक जवळल येईल, तस-तसे चौकशीचे उंदीर हळूच बाहेर काढतील आणि बघा यांनी किती भ्रष्ट्राचार केला आहे, हे ते देशाला सांगतील़ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही आवाज तर त्यांनी दाबलाच आहे़आता बारामतीकरांचाही आवाज ते दाबणार आहेत़ त्यासाठी सरकारने बारामतीचा दाऊद नावाचा उंदीर बाहेर काढला आहे़ त्यामुळे यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसही कोमात जाईल़ अशा पद्धतीने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना सरकार शेवटपर्यंत कोमात ठेवेल, असे भाकितही आंबेडकर यांनी केले़ यावेळी किसन चव्हाण, अरुण जाधव यांची भाषणे झाली़ सूत्रसंचालन संजय चव्हाण यांनी केले़निवडणुकीतून आरएसएसचा खात्मा करादेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रडणे, हसणे, लढाई युध्द काहीच खरे नाही़ देशाचे सूत्र नागपूरातून हालविले जात आहेत़ देशाची लोकशाही झारीतील शुक्राचार्यांच्या हाती आहे़ त्यांचे अस्तित्व धोक्यात आले की सर्वप्रथम जात बाहेर काढतात़ त्यानेही प्रश्न सुटला नाही तर धर्म बाहेर काढतात़ धर्मानेही प्रश्न सुटत नसल्याने ते आता देश संकटात असल्याचे सांगत आहेत़ देशावर कुठलेही संकट नाही़ असे असताना युध्दाचे कारण पुढे करून ते देशात आणीबाणी जाहीर करू शकतात, अशी भीती लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली़भाजपकडून कारवायांचे मार्केटिंगपाकिस्तानवर यापूर्वी भारताने अनेक मोठ्या कारवाया केल्या़ पण त्याचे मार्केटिंग कधीही केले नाही़ भाजप सरकारकडून मात्र पाकिस्तानी कारवायांचे जबरदस्त मार्केटिंग केले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नगर येथे केला़वंचित बहुजन आघाडीच्या येथील क्लेराब्रुस मैदानावर झालेल्या सत्ता परिवर्तन सभेत ते बोलत होते़यावेळी लक्ष्मण माने, किसन चव्हाण, अरुण जाधव, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते़ भारत- पाकिस्तान कारवायांवरून आंबेडकर यांनी भाजप सरकारावर टीकेची झोड उठविली़ ते म्हणाले़, पाकिस्तान तिकडे बसून देशाची खोड काढतो आहे़ त्याविरोधात लढण्याचे ठोस धोरण सरकारकडे नाही़ पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज आहे़ त्यासाठी हिंमत लागते़ ती आपल्या देशाचे ५६ इंच छाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही़ सर्जिकलस्ट्राईकचाही काहीही परिणाम झालेला नाही़ पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या सैनिकांनी पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला़ या कारवाईचे स्वागतच आहे़ पण, खरोखर हवाई हल्ल्याची गरज होती का ? मिसाईल टाकणेही शक्य होते़ पण तसे न करता हवाई हल्ला केला गेला़ विमाने पाकिस्तानात घुसविली़ मग माघार का घेतली? लढाई सुरूच ठेवायला हवी होती़ जोपर्यंत शेवटचा मरत नाही, तोपर्यंत कारवाई सुरूच राहिली असती तर पाकिस्तानला जरब बसली असती़ परंतु, तसे केले नाही़ त्यामुळे पाकिस्तानची हिमंत वाढली आहे़ परिणामी या कारवाया आपल्या बाजूने कमी, विरोधात जास्त गेल्या आहेत, अशी टीका आंबेडकर यांनी यावेळी केली़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस