शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विद्यार्थिनींना मिळतोय अवघा एक रुपया भत्ता; सरकारकडून होणा-या थट्टेने गाठले रौप्यमहोत्सवी वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 17:22 IST

आदिवासी व अनुसूचित जाती-जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींना प्रती दिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो. १९९२ पासून आजतागायत या प्रोत्साहन भत्त्यात कोणतीही वाढ झालेली नसताना हा रुपयादेखील वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देप्राथमिक शाळेत जाणा-या मुलींच्या गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी व त्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.आदिवासी, अनुसूचित जाती-जमातींमधील पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलींच्या पालकांना प्रती दिन एक रुपया देण्याचे ठरले. आश्रम शाळेतील मुलींनादेखील यात सामावून घेण्यात आले.सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मुलींना त्याच एक रुपयांतून आजही प्रोत्साहन देण्याचा प्रकार म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार ठरला आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : आदिवासी व अनुसूचित जाती-जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींना प्रती दिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो. १९९२ पासून आजतागायत या प्रोत्साहन भत्त्यात कोणतीही वाढ झालेली नसताना हा रुपयादेखील वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. सरकारने ही थट्टा थांबवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याचे धोरण राज्य सरकारने घेतले. त्यानुसार प्राथमिक शाळेत जाणा-या मुलींच्या गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी व त्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. आदिवासी, अनुसूचित जाती-जमातींमधील पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलींच्या पालकांना प्रती दिन एक रुपया देण्याचे ठरले. आश्रम शाळेतील मुलींनादेखील यात सामावून घेण्यात आले.विशेष बाब म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. फुले यांच्याच जन्मदिनी त्यास मंजुरी देण्यात आली होती. पालकांना अथवा मुलींना त्याच एक रुपयांतून आजही प्रोत्साहन देण्याचा प्रकार म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार ठरला आहे.

‘भत्ता नको पण...’

पंचायत समितीत योजनेचा आढावा घेतला असता सन २०१४-१५च्या शैक्षणिक वर्षासाठी १ लाख ७० हजार रुपये मिळाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, अनुसूचित जाती तसेच भटक्या जमातीमधील मुलींचे पैसे अजूनही प्राप्त झालेले नसल्याचे समोर आले. वर्ष संपल्यानंतरही पैसे येत नसल्याची बाबही समोर आली. मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांपासून ते शिक्षणाधिकाºयांपर्यंत यासाठी कराव्या लागणा-या कागदी घोड्यांमुळे तर ‘भत्ता नको पण...’ म्हणण्याची वेळ आली आहे.

शिष्यवृत्तीतही जाचक अटी

आदिवासी शिष्यवृत्तीसाठी पालकांना अनेक जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते, तहसीलदारांकडील जातीचे दाखले, त्यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला, आधारशी संलग्नता यामुळे यामुळे प्रस्ताव तयार करण्यात अडचणी येत आहेत. कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याची ओरड शिक्षकांमधून होत आहे.

मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन भत्ता द्यावा लागतो, ही बाबच दुदैवी आहे. वर्षाला मिळणा-या दोनशे रुपयांसाठी बँकेत खाते उघडावे लागते व ते पैसेदेखील मिळत नाही, हा प्रकार संतापजनक आहे.-स्मिता पानसरे, शिक्षिका.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर