शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
2
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
3
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार
4
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
5
मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल
6
१००% पैसे होणार डबल! पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये ₹२५,००० ची गुंतवणूक देईल लाखोंचा रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
8
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
9
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
10
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
11
मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!
12
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
13
व्हॉट्‌सॲपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग पडली महागात; क्षणात पावणेपाच लाख झाले गायब
14
‘आयटीआर’मधील चलाखी; गुरुजी ‘आयकर’च्या रडारवर
15
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 
16
सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांना १० कोटींचा गंडा, अकोल्यातील महाठगाच्या दिल्लीत आवळल्या मुसक्या
17
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
18
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
19
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
20
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण

आघाडी सरकार जनतेत नाहीेतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर; राधाकृष्ण विखे यांची टीका, लोणीत भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 14:26 IST

सरकारचे आपत्ती व्यवस्थापन फक्त आधिका-यांच्या भरवश्यावर सुरु आहे. मंत्री फक्त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर दिसतात. केंद्राच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय देणार? असा सवालही येथे माजीमंत्री, आ.राधाकृष्ण विखे यांनी सरकारला केला.

लोणी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास राज्य सरकार संपूर्णत: अपयशी ठरले आहे. सरकारचे आपत्ती व्यवस्थापन फक्त आधिका-यांच्या भरवश्यावर सुरु आहे. मंत्री फक्त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर दिसतात. केंद्राच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय देणार? असा सवालही येथे माजीमंत्री, आ.राधाकृष्ण विखे यांनी सरकारला केला. लोणी बुद्रूूूक ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.२२ मे) आ.विखे यांच्या नेतृत्वाखाली फिजीकल डिस्टसिंगचा नियम पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. शिर्डी मतदार संघातील सर्वच गावांमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या घराच्या अंगणात महाराष्ट्र बचाव आंदोलन करुन आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा मास्क बांधून आणि काळे झेंडे दाखवून निषेध केला. लोणी बुद्रूक येथे झालेल्या आंदोलनात माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, नंदू राठी,चांगदेव विखे,  लक्ष्मण बनसोडे, अनिल विखे, अनिल विखे उपस्थित होते. कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळेच राज्यात रुग्णांची संख्या ४१ हजारांपर्यंत जावून पोहचली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकारने जाणीवपूर्वक केली नाही. केंद्र सरकारच्या मदतीचा लाभही आघाडी सरकार जनतेपर्यंत पोहोचवू शकले नसल्याने सरकारच्या या हलगर्जीपणामुळेच सर्वसामान्य नागरिक मृत्युच्या खाईत लोटला गेला असल्याचा थेट आरोप विखे यांनी यावेळी केला.  राज्यात पाहाणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीने ७६ हजार बेडची उपलब्धता करण्याची सूचना सरकारला केली होती. परंतू आघाडी सरकार फक्त तात्पुरत्या उपाययोजना करीत बसले. केंद्र सरकारने दिलेले पीपीई किटही डॉक्टर्स, नर्स आणि पोलीस दलापर्यंत पोहोचले नाहीत. उलट पोलिसांवर हल्ले होत असताना सरकारमधील मंत्र्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविताना आघाडी सरकार अतिशय असंवेदनशील वागले. महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत सरकारने मदत केंद्र उभी करायला हवी होती. पण सरकार तेही करु शकले नाही, असेही विखे म्हणाले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील