शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

कोतकरचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: May 22, 2014 00:01 IST

अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी भानुदास कोतकर याने केलेला जामीन अर्ज नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. कदम यांनी फेटाळला आहे.

अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी भानुदास कोतकर याने केलेला जामीन अर्ज नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. कदम यांनी फेटाळला आहे. दरम्यान हा खटला नगर येथून वर्ग झाला असून त्याची पुढील सुनावणी २९ मे रोजी होणार आहे. लांडे खून प्रकरणातील खटला हा मीडिया ट्रायल असल्याचे कारण सांगून हा खटला अन्य जिल्ह्यात वर्ग करण्याची याचिका आरोपींनी केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला नाशिकला वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी भानुदास कोतकर याने २१ मार्च २०१४ रोजी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर नाशिक न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणातील मूळ फिर्यादी शंकर राऊत यांनी कोतकरचे यापूर्वी बारा वेळा जामीन फेटाळण्यात आले आहेत. कोतकरला गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वी कोणत्या कारणामुळे कोतकरचा जामीन फेटाळण्यात आला, त्याचे निकालपत्रही राऊत यांनी न्यायालयाला सादर केले. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील एस.पी. माने यांनी काम पाहिले. आरोपीतर्फे अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) वक्तव्य भोवले महापालिका निवडणुकीच्या काळात राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केडगाव येथील सभेतील भाषणात काँग्रेस पक्ष व राज्य सरकार कोतकर यांच्या पाठिशी असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबतची कात्रणेही राऊत यांनी न्यायालयाला सादर केली. त्यामुळे लांडे खून प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी ही पॉलिटिकल ट्रायल झाल्याचे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कोतकरला कोणत्याही प्रकारे जामीन मंजूर करू नये, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. विखे यांचे वक्तव्य लांडे खून प्रकरणात चांगलेच अडचणीचे ठरले आहे. कोतकर सबजेलमध्येच लांडे खून प्रकरणाचा खटला नाशिकला वर्ग झाला तरी आरोपी भानुदास कोतकर सध्या नगरच्या उपकारागृहात आहे. त्यामुळे नाशिक येथे सुनावणीसाठी त्याला खास वाहनामार्फत नाशिकला नेले जाते. आरोपीवर एवढा खर्च कशासाठी असा आक्षेप घेत कोतकरला नाशिकच्या कारागृहात हलवावे, अशी मागणी केली आहे. याबाबत राऊत यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील, तुरुंग महानिरीक्षक मीरा बोरवणकर, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना निवेदन दिले आहे. मात्र या तक्रारीची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. उपकारागृहाचे अधीक्षक ज्ञानेश्वर काळे आणि भानुदास कोतकर हे नातेवाईक असल्याने कोतकरचे उपकारागृहात पुरविले जाणारे लाड नाशिकला होणार नाहीत, ही भीती प्रशासनाला असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.