शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

कोतकरचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: May 22, 2014 00:01 IST

अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी भानुदास कोतकर याने केलेला जामीन अर्ज नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. कदम यांनी फेटाळला आहे.

अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी भानुदास कोतकर याने केलेला जामीन अर्ज नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. कदम यांनी फेटाळला आहे. दरम्यान हा खटला नगर येथून वर्ग झाला असून त्याची पुढील सुनावणी २९ मे रोजी होणार आहे. लांडे खून प्रकरणातील खटला हा मीडिया ट्रायल असल्याचे कारण सांगून हा खटला अन्य जिल्ह्यात वर्ग करण्याची याचिका आरोपींनी केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला नाशिकला वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी भानुदास कोतकर याने २१ मार्च २०१४ रोजी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर नाशिक न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणातील मूळ फिर्यादी शंकर राऊत यांनी कोतकरचे यापूर्वी बारा वेळा जामीन फेटाळण्यात आले आहेत. कोतकरला गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वी कोणत्या कारणामुळे कोतकरचा जामीन फेटाळण्यात आला, त्याचे निकालपत्रही राऊत यांनी न्यायालयाला सादर केले. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील एस.पी. माने यांनी काम पाहिले. आरोपीतर्फे अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) वक्तव्य भोवले महापालिका निवडणुकीच्या काळात राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केडगाव येथील सभेतील भाषणात काँग्रेस पक्ष व राज्य सरकार कोतकर यांच्या पाठिशी असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबतची कात्रणेही राऊत यांनी न्यायालयाला सादर केली. त्यामुळे लांडे खून प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी ही पॉलिटिकल ट्रायल झाल्याचे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कोतकरला कोणत्याही प्रकारे जामीन मंजूर करू नये, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. विखे यांचे वक्तव्य लांडे खून प्रकरणात चांगलेच अडचणीचे ठरले आहे. कोतकर सबजेलमध्येच लांडे खून प्रकरणाचा खटला नाशिकला वर्ग झाला तरी आरोपी भानुदास कोतकर सध्या नगरच्या उपकारागृहात आहे. त्यामुळे नाशिक येथे सुनावणीसाठी त्याला खास वाहनामार्फत नाशिकला नेले जाते. आरोपीवर एवढा खर्च कशासाठी असा आक्षेप घेत कोतकरला नाशिकच्या कारागृहात हलवावे, अशी मागणी केली आहे. याबाबत राऊत यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील, तुरुंग महानिरीक्षक मीरा बोरवणकर, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना निवेदन दिले आहे. मात्र या तक्रारीची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. उपकारागृहाचे अधीक्षक ज्ञानेश्वर काळे आणि भानुदास कोतकर हे नातेवाईक असल्याने कोतकरचे उपकारागृहात पुरविले जाणारे लाड नाशिकला होणार नाहीत, ही भीती प्रशासनाला असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.