आवर्तनाने आणले जेरीस

By Admin | Updated: June 15, 2014 00:30 IST2014-06-14T23:04:58+5:302014-06-15T00:30:46+5:30

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन राजकीय चक्रव्यूहात अडकल्याने तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Jerez brought in recurring | आवर्तनाने आणले जेरीस

आवर्तनाने आणले जेरीस

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन राजकीय चक्रव्यूहात अडकल्याने तालुक्यातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
गेल्यावर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे घोड व कुकडी लाभक्षेत्रातील धरणे ओसंडून वाहिली. कुकडी व घोडच्या लाभक्षेत्रात ऊस, फळबागा, भाजीपाला, कपाशीसारखी पिके तरारली. घोडची यापूूर्वी चार आवर्तने सोडण्यात आली. आता कुकडीची तीन आवर्तने सोडण्यात आली.
ंं आवर्तनाची टोलवाटोलवी
कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे अशी मागणी लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी केली. सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर १५ जून रोजी पिण्यासाठी आवर्तन सुटेल असे गाजर दाखविण्यात आले. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कुकडीचे आवर्तन सोडता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट करुन आवर्तनाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या दालनात टाकला.
कुकडी प्रकल्पातील धरणांमधील खालावलेला पाणीसाठा, पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकमधील पाण्याचे राजकारण व विधानसभा निवडणुकीचे वेध लक्षात घेऊन कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी तालुक्यातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कोणत्याच धरणातून पाणी सोडता येणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली.
(तालुका प्रतिनिधी)
आवर्तन अशक्य
कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीविना कोणत्याच धरणातून पाणी सोडता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तातडीने आवर्तन सोडणे सध्या अशक्य आहे.
बबनराव पाचपुते,
आमदार, श्रीगोंदा
बैल गेला अन्
कुकडी व घोडच्या चौथ्या आवर्तनाचा निर्णय एकत्रित घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठाम भूमिका घेणे आवश्यक होते. वरिष्ठ पातळीवर कोणी बोलत नाही. आता कुकडी, घोडच्या आवर्तनाची ‘बैल गेला अन् झोपा केला’ अशी अवस्था झाली आहे.
- शिवाजीराव नागवडे,
ज्येष्ठ नेते, श्रीगोंदा
जबाबदार कोण ?
कुकडीची चार आवर्तने सोडता येतील, अशी परिस्थिती होती. कुकडीचे पाच टीएमसी पाणी पुणेकरांनी कुठे पळविले? याचा थांगपत्ता लागू दिला नाही. आता शेतकऱ्यांची पिके जळाल्यास कोण नुकसान भरपाई देणार?
- बाळासाहेब नाहाटा,
सभापती, बाजार समिती, श्रीगोंदा
हिशोब मिळेल का?
आम्ही कुकडीच्या पाण्यासाठी भांडलो. त्यावेळी काही नेत्यांना राजकारण दिसले. कुकडीच्या चौथ्या आवर्तनाचे पाणी कुठे मुरले याचा हिशोब जनतेला मिळेल का? घोडप्रमाणे कुकडी लाभधारकांना केव्हा न्याय मिळणार?
- राहुल जगताप,
अध्यक्ष, कुकडी साखर कारखाना

Web Title: Jerez brought in recurring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.