शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

‘पेसा’ तील पद आता का भरले : सीईओ माने यांची ही अनियमितता नव्हे का?

By साहेबराव नरसाळे | Updated: July 24, 2019 11:02 IST

आदिवासी क्षेत्र म्हणजे ‘पेसा’तील पदे रिक्त ठेवता येत नाही हा न्यायालयाचा आदेश असताना महिला बालकल्याण विभागाच्या बदल्यांमध्ये हे पद रिक्त ठेवण्यात आले.

साहेबराव नरसाळेअहमदनगर : आदिवासी क्षेत्र म्हणजे ‘पेसा’तील पदे रिक्त ठेवता येत नाही हा न्यायालयाचा आदेश असताना महिला बालकल्याण विभागाच्या बदल्यांमध्ये हे पद रिक्त ठेवण्यात आले. याबाबत आक्षेप घेतला जाताच अनुकंपा भरतीत हे पद घाईघाईने भरण्यात आले. त्यामुळे ही प्रशासनाची अनियमितता नव्हे का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. विभागीय आयुक्तांसह शासनाने ही बाब सोयीस्कर दुर्लक्षित केली आहे.जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना महिला बालकल्याण विभागात पर्यवेक्षिकांच्याही बदल्या करण्यात आल्या. या बदल्या करताना अकोले तालुक्यातील ‘पेसा’ क्षेत्रातील एक पद रिक्त होते. हे पद प्रशासकीय बदलीने प्राधान्याने भरले जाणे आवश्यक होते. तसे बंधनकारकच आहे. मात्र, महिला बालकल्याण विभागाने हे पद रिक्तच ठेवले. या पदासाठी सरळसेवा भरतीची जाहिरात देण्यात आली असल्याने हे पद रिक्त ठेवले जात आहे, असे कारण त्यावेळी प्रशासनाने दिले. हे पद रिक्त ठेवल्याने प्रशासकीय बदलीत अग्रक्रमावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ‘पेसा’तील बदली टळली. यात निशा राहिंज यांना राहुरी येथे सोयीने नियुक्ती देण्यात आली. वास्तविकत: ज्या तालुक्यात सर्वाधिक जागा रिक्त आहेत त्या तालुक्यात त्यांना नियुक्ती दिली जाणे आवश्यक होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी हस्तक्षेप करत राहिंज यांना राहुरी येथे नियुक्ती देण्याची शिफारस सभागृहात केली.‘पेसा’तील पद तेव्हाच भरले गेले असते तर राहिंज यांना कदाचित अकोले येथे नियुक्ती घ्यावी लागली असती. त्यामुळे प्रशासनाने ‘पेसा’तील पद जाणीपूर्वक रिक्त ठेवले, असा संशय आहे.ही बाब उघडकीस होताच प्रशासनाने आता अनुकंपा तत्वाच्या भरतीत ‘पेसा’तील पद भरुन टाकले आहे.सरळ सेवा भरती अजून झालेली नसताना आता हे पद का भरले ? असा प्रश्न उपस्थित होतो. ‘आम्ही हे पद तात्पुरते भरले असून सरळसेवा भरतीने उमेदवार मिळाल्यानंतर त्या उमेदवारास ‘पेसा’त पदस्थापना देऊन आता नियुक्ती केलेल्या पर्यवेक्षिकेची इतरत्र बदली करु’, असा पवित्रा आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी घेतला आहे. ही बाब बदल्यांतही शक्य असताना तेव्हा हे पाऊल का उचलले नाही? त्यामुळे महिला बालकल्याण विभागाची बदल्यांची प्रक्रियाच चुकली असल्याचे स्पष्ट होते. अधिका-यांनी नियम डावलल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असा नियम आहे.‘सेवा उपलब्धी’ कोणत्या नियमानुसार?वर्षानुवर्षे कर्मचारी एका जागेवर राहू नये म्हणून बदल्यांचे धोरण आहे. असे असताना जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासनाची गरज दाखवत काही कर्मचा-यांची ‘सेवा उपलब्धी’ या नावाखाली दुस-या विभागात बदली करतात. असे ४९ कर्मचारी जिल्हा परिषदेत आहेत. या कर्मचाº-ची ही सोयीस्कर बदली कोणत्या निकषांवर केली जाते? सेवा उपलब्धीसाठी हे ठराविक कर्मचारीच पात्र कसे ठरतात? याचे उत्तर प्रशासनाने दिलेले नाही.च्या नियुक्त्या रद्द करावयाच्या असतील तर अध्यक्षा शालिनी विखे यांनी संमती द्यावी, असा बचावात्मक पवित्रा मुख्य कार्यकारी अधिका-यांनी घेतला आहे. वास्तविकत: मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत: या नियुक्त्या केव्हाही रद्द करु शकतात. त्यामुळे जिल्हा परिषदेत प्रशासनातील अधिकारी राजकारण व कर्मचा-यांत दुजाभाव करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. च्बदलीच्या धोरणात ‘सेवा उपलब्धता’ या नावाखाली बदली करण्याचा नियम नसताना या नियुक्त्या कशा होतात? हाही प्रश्न आहे. महिला बालकल्याण विभागाने पारनेर येथे कार्यरत असलेल्या सहायक महिला बालविकास प्रकल्प अधिका-याला थेट शेवगाव येथील पदभार दिला होता. हे प्रकरण जिल्हा परिषद सभेत गाजले. हे कोणाच्या आदेशाने झाले ते प्रशासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.विभागीय आयुक्त या बाबींची चौकशी करणार का? असा मुद्दा आता उपस्थित झाला आहे.पशुसंवर्धनच्या बदल्या तीन वेळा का बदलल्या?पशुसंवर्धन विभागाच्या बदल्यांमधील घोळ तब्बल तीन दिवस चालला होता. प्रशासनाला तीन वेळा पशुसंवर्धन विभागातील बदल्यांमध्ये फेरबदल करावे लागले.  याची प्रशासनाने सदस्यांना, पदाधिका-यांना माहिती का दिली नाही, या विभागाच्या बदल्या तब्बल तीन वेळा का बदलण्यात आल्या, याचीही माहिती का दडवली जात आहे, या प्रश्नांची उत्तरेही मुख्य कार्यकारी अधिका-यांनी अद्याप दिलेली नाहीत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषदShalini Vikhe Patilशालिनी विखे पाटील