शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अकोलेत बहरला इंडोनेशियाचा निळा भात; राज्यातील पहिला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 02:26 IST

दहा एकर क्षेत्रावर केली लागवड

- मच्छिंद्र देशमुख अहमदनगर : अकोले तालुक्याच्या कृषी विविधतेत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. गर्द निळ्या रंगाचा इंडोनेशियातील तांदूळ अकोले तालुक्यातील आदिवासी खेड्यांमध्ये बहरला आहे. यंदा ही लागवड दहा एकरावर वाढली आहे. निळ्या भात लागवडीचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथील प्रयोगशील शेतकरी विकास देवराम आरोटे हे मागील वर्षी कोलकाता येथे झेंडूची रोपे आणण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना निळा व काळा असे भाताचे दोन प्रकार दिसले. त्यातील त्यांनी ३ किलो निळा वाण सोबत आणला. या तीन किलो तांदळाची रोपे तयार करुन त्यांनी गेल्या वर्षी मेहंदुरी येथे ५ गुंठे क्षेत्रात या रोपांची लागवड केली. त्यापासून २00 किलो बियाणे तयार झाले.

यंदा धामणवन आणि शिरपुंजे येथील २0 शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केली. सध्या या भाताची जोमदार वाढ झाली आहे. मेहंदुरीत आरोटे यांच्या शेतात वीस गुंठे क्षेत्रातील भात ओंब्या येण्याच्या अवस्थेत आहेत. या भातात औषधी गुणधर्म या भातात फायबर, लोह, ताम्र, अ‍ॅन्टीआॅक्सिडंटचे प्रमाण अधिक आहे. भारतात हा आसामी काळभात म्हणून प्रसिद्ध आहे. पंचतारांकित हॉटेलात याला मोठी मागणी असते. उंची जास्त व दणकट बुंधा असल्याने वाºयाने पडत नाही. एकरी वीस ते पंचवीस पोते साळ निघते.

शिजवल्यावर दिसतो जांभळा हा भात इंडोनेशिया व आसामच्या व्यापार संबंधातून भारतात आला. त्याची साळ निळी, जांभळी तर तांदूळ गर्द जांभळे व लांबट आहेत. औषधी गुणधर्म असलेला हा भात शिजवल्यावरही जांभळा दिसतो. सध्या बाजारात तीनशे ते पाचशे रुपये दराने विक्री होते. आसाम, मणिपूर, पंजाबमध्ये निर्यातक्षम तांदुळात याची गणना होते.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र