शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अकोलेत बहरला इंडोनेशियाचा निळा भात; राज्यातील पहिला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 02:26 IST

दहा एकर क्षेत्रावर केली लागवड

- मच्छिंद्र देशमुख अहमदनगर : अकोले तालुक्याच्या कृषी विविधतेत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. गर्द निळ्या रंगाचा इंडोनेशियातील तांदूळ अकोले तालुक्यातील आदिवासी खेड्यांमध्ये बहरला आहे. यंदा ही लागवड दहा एकरावर वाढली आहे. निळ्या भात लागवडीचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथील प्रयोगशील शेतकरी विकास देवराम आरोटे हे मागील वर्षी कोलकाता येथे झेंडूची रोपे आणण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना निळा व काळा असे भाताचे दोन प्रकार दिसले. त्यातील त्यांनी ३ किलो निळा वाण सोबत आणला. या तीन किलो तांदळाची रोपे तयार करुन त्यांनी गेल्या वर्षी मेहंदुरी येथे ५ गुंठे क्षेत्रात या रोपांची लागवड केली. त्यापासून २00 किलो बियाणे तयार झाले.

यंदा धामणवन आणि शिरपुंजे येथील २0 शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केली. सध्या या भाताची जोमदार वाढ झाली आहे. मेहंदुरीत आरोटे यांच्या शेतात वीस गुंठे क्षेत्रातील भात ओंब्या येण्याच्या अवस्थेत आहेत. या भातात औषधी गुणधर्म या भातात फायबर, लोह, ताम्र, अ‍ॅन्टीआॅक्सिडंटचे प्रमाण अधिक आहे. भारतात हा आसामी काळभात म्हणून प्रसिद्ध आहे. पंचतारांकित हॉटेलात याला मोठी मागणी असते. उंची जास्त व दणकट बुंधा असल्याने वाºयाने पडत नाही. एकरी वीस ते पंचवीस पोते साळ निघते.

शिजवल्यावर दिसतो जांभळा हा भात इंडोनेशिया व आसामच्या व्यापार संबंधातून भारतात आला. त्याची साळ निळी, जांभळी तर तांदूळ गर्द जांभळे व लांबट आहेत. औषधी गुणधर्म असलेला हा भात शिजवल्यावरही जांभळा दिसतो. सध्या बाजारात तीनशे ते पाचशे रुपये दराने विक्री होते. आसाम, मणिपूर, पंजाबमध्ये निर्यातक्षम तांदुळात याची गणना होते.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र