इंडियन सिमलेस अखेर सुरू
By Admin | Updated: June 15, 2014 00:32 IST2014-06-14T23:15:20+5:302014-06-15T00:32:02+5:30
अहमदनगर: इंडियन सिमलेस कंपनीतील कामगारांवरील बेकारीचे मळब दूर झाले आहे़ कामगार संघटना व व्यवस्थापनात सकारात्मक चर्चा होऊन तिसऱ्या दिवशी शनिवारी तोडगा निघाला
इंडियन सिमलेस अखेर सुरू
अहमदनगर: इंडियन सिमलेस कंपनीतील कामगारांवरील बेकारीचे मळब दूर झाले आहे़ कामगार संघटना व व्यवस्थापनात सकारात्मक चर्चा होऊन तिसऱ्या दिवशी शनिवारी तोडगा निघाला असून, कंपनीने ट्यूबचे उत्पादन शनिवारी रात्रीच सुरू झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़
नागापूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन सिमलेस कंपनीने उत्पादन बुधवारपासून बंद केले होते़ कामगार संघटना व व्यवस्थानात वाद झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता़ कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे दीड हजार कामगारांचा प्रश्न निर्माण झाला होता़ कंपनी आवारात बैठक घेऊन कामगारांना दमदाटी करणे, व्यवस्थापनाच्याविरोधात घोषणाबाजी करणे, यासारख्या कारणावरून १२ कामगारांना ताडकाफडकी निलंबत केले होते़ त्यामुळे वादात आणखी भर पडली़ परिणामी कंपनी पुन्हा सुरू होण्याची आशा मावळली होती़ मात्र तिसऱ्या दिवशी शनिवारी सांयकाळी कंपनीच्या आवारात झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला आणि कामगारांची एकच जल्लोष करीत कंपनीच्या निर्णयाचे स्वागत केले़ शनिवारीच रात्री बेअरिंगसाठी लागणारी ट्यूब बनविण्याच्या कामास सुरुवात झाली असून, उद्या रविवारपासून पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू केले जाणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे़ बैठकीस कंपनीचे प्रमुख किशोर फरांदे, संघटनेचे बाबूशेठ टायरवाले आदी उपस्थित होते़
कामगारांना ४५०० पगारवाढ
पगारवाढीची कामगारांची प्रमुख मागणी होती़ यावर बैठकीत चर्चा झाली़ कामगारांचे करार पूर्ण करून कामगारांना ४५०० रुपयांची पगारवाढ देण्याचा निर्णय झाला़ त्यामुळे कामगार कामावर हजर झाले असून, उत्पादनास सुरुवात झाली आहे़ १२ कामगारांचे निलंबन मागे घेण्यात आल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली आहे़
दोन्ही बाजंूनी सकारात्मक चर्चा झाली़ कामगारांवरील निलंबन मागे घेण्यात आले आहे़ पगारवाढीचाही निर्णय झाला असून, उत्पादन शनिवारी रात्रीपासूनच सुरुवात करण्यात आले आहे़
- दिनेश देव, कंपनीचे प्रतिनिधी
कामगारांच्या मागण्या कंपनी व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत़ बैठकीत याविषयी सकारात्मक निर्णय झाल्याने काम सुरू करण्यास कामगारांनी तयारी दर्शविली आहे़
- बाबूशेठ टायरवाले, अध्यक्ष, जिल्हा मजदूर सेना.
कंपनी व्यवस्थापन व संघटनेच्या प्रतिनिधींची कंपनीत बैठक झाली़ या बैठकीत सकरात्मक चर्चा होऊन कामगारांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे़ कंपनीचे उत्पादनही सुरू झाले आहे़- बाळासाहेब वाघ, सहाय्यक कामगार आयुक्त.