शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव तालुक्यातील नद्यांच्या पुनरूत्थानाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST

शेवगाव : तालुक्यातील नद्या, ओढे, नाले यांच्या पुनरूत्थानाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गत आठवड्यात नदीकाठच्या काही गावांना पुराचा तडाखा बसला. ...

शेवगाव : तालुक्यातील नद्या, ओढे, नाले यांच्या पुनरूत्थानाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गत आठवड्यात नदीकाठच्या काही गावांना पुराचा तडाखा बसला. नदीपात्राला पडलेला बाभळींचा विळखा, अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे अरुंद झालेले पात्र, प्रदूषण याचा सर्वाधिक परिणाम महापुरात दिसून आला.

गत आठवड्यात नदी तिरावरील गावांना पुराचा फटका बसला. त्यात कोट्यवधींचे नुकसान झाले. शेकडो जनावरे वाहून गेली. भविष्यातील धोका लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच नद्यांची रुंदीकरण मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. नुकत्याच आलेल्या अनुभवामुळे नदी तिरावरील गावकऱ्यांना पाऊस आला की जीव मुठीत घेऊन राहावे लागते आहे.

शेवगाव तालुक्यातून गोदावरी, नंदिनी, ढोरा, काशी, भागीरथी, खटकळी, चांदणी, सुकी आदीसह अन्य प्रमुख नद्या वाहत आहेत. यातील बहुतांश नद्या गर्भगिरीच्या डोंगरमाथ्यावरून प्रवाहित होऊन वाहतात. तर अनेक ठिकाणचे ओढे, नाले प्रमुख नद्यांना मिळतात. सोबतच अनेक लहान-मोठ्या नद्या व नाले आहेत. तालुक्याला सुपीक बनविण्यात या नद्यांचा मोठा हातभार लागला आहे. काही नद्या बाराही महिने खळखळून वाहतात तर काही हिवाळ्यातच कोरड्या पडतात. तालुक्यासाठी जीवनदायीनी असलेल्या या नद्या मात्र सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बेशरम वृक्ष वाढले आहेत. मोठी झुडपे, बाभळी नदीपात्रात दिसून येतात. झुडपांमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा अडकतो. पहिल्या पुरासोबत आलेला कचरा या झुडपांना अडकतो. त्यामुळे नदीचा प्रवाह बदलतो. याचा प्रत्यय आखेगाव ते सोमठाणे दरम्यानच्या नदीने बदललेल्या प्रवाहातून शेती वाहून गेल्याने आला आहे.

यापूर्वी महात्मा फुले जल व भूमी अभियान राबविण्यात आले होते.

-------

नद्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. त्यासाठी नद्यांमध्ये जाणारे सांडपाणी आणि कचरा तत्काळ थांबविला पाहिजे. सांडपाणी आणि कचऱ्याचे प्रमाण शून्यावर आले की नद्या मोकळा श्वास घेऊ शकतील. तसेच नद्यांमध्ये उभारण्यात आलेले काँक्रीटची बांधकामे जमीनदोस्त केली पाहिजे.

-हर्षदा काकडे,

जिल्हा परिषद सदस्या

----

पुरानंतर नद्यांच्या पुनरुत्थानासाठी प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे. नाल्यांना गटार समजून त्यात सांडपाणी सोडले जाते. तेच नाले नद्यांना जाऊन मिळतात. त्यामुळे नद्या प्रदूषित होतात. नदी पात्रातील झुडपे काढून अतिक्रमण हटवायला हवेत.

-बाळासाहेब फटांगडे, सामजिक कार्यकर्ते

---

०६ शेवगाव

नुकत्याच आलेल्या पुरामुळे आखेगाव शिवारातन वाहणाऱ्या नंदिनी नदीने प्रवाह बदलल्याने शेती वाहून गेली.