शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जायकवाडीला पाणी सोडल्यास रस्त्यावर उतरू - आमदार लहू कानडे

By शिवाजी पवार | Updated: November 3, 2023 15:47 IST

समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणातून मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे समजते.

श्रीरामपूर : भंडारदरा, मुळा तसेच निळवंडे धरणांचेपाणी जायकवाडीत सोडल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊन शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होतील. त्यामुळे या प्रश्नावर शेतक-यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी दिला आहे. नेवासेचे आमदार शंकरराव गडाख यांनीही याप्रश्नी नगर औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी रास्तारोको आंदोलन केले होते.समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणातून मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे समजते.    श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघ तसेच संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासे, आदी उत्तर नगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांमध्ये ६० ते ७० टक्के घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर व राहुरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना आकडेवारीसह निवेदनही दिले असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले.केवळ रब्बीचा हंगाम पाटपाण्याच्या मदतीने घेणे एवढीच छोटीशी आशा आहे. त्यामुळे भंडारदरा, मुळा, निळवंडेच्या पाण्यावर शेतकऱ्यांना तग धरावा लागेल. शेतकऱ्यांना मान्य नसणाऱ्या अन्यायकारी समन्यायी पाणीवाटपाच्या कायद्याद्वारे भंडारदरा, मुळा तसेच निळवंडेतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडल्यास शेतकऱ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होतील.               जायकवाडी धरणामध्ये पुरेसे पाणी असल्याने पाणी सोडण्याची गरज नाही. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. जलसंपदा विभागाने असा निर्णय घेऊ नये, असे पत्र जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता यांना दिल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरDamधरणJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी