शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जायकवाडीला पाणी सोडल्यास रस्त्यावर उतरू - आमदार लहू कानडे

By शिवाजी पवार | Updated: November 3, 2023 15:47 IST

समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणातून मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे समजते.

श्रीरामपूर : भंडारदरा, मुळा तसेच निळवंडे धरणांचेपाणी जायकवाडीत सोडल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊन शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होतील. त्यामुळे या प्रश्नावर शेतक-यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी दिला आहे. नेवासेचे आमदार शंकरराव गडाख यांनीही याप्रश्नी नगर औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी रास्तारोको आंदोलन केले होते.समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणातून मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे समजते.    श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघ तसेच संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासे, आदी उत्तर नगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांमध्ये ६० ते ७० टक्के घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर व राहुरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना आकडेवारीसह निवेदनही दिले असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले.केवळ रब्बीचा हंगाम पाटपाण्याच्या मदतीने घेणे एवढीच छोटीशी आशा आहे. त्यामुळे भंडारदरा, मुळा, निळवंडेच्या पाण्यावर शेतकऱ्यांना तग धरावा लागेल. शेतकऱ्यांना मान्य नसणाऱ्या अन्यायकारी समन्यायी पाणीवाटपाच्या कायद्याद्वारे भंडारदरा, मुळा तसेच निळवंडेतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडल्यास शेतकऱ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होतील.               जायकवाडी धरणामध्ये पुरेसे पाणी असल्याने पाणी सोडण्याची गरज नाही. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. जलसंपदा विभागाने असा निर्णय घेऊ नये, असे पत्र जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता यांना दिल्याचे कानडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरDamधरणJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी