शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले असते तर महाराष्ट्राला मदत झाली असती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST

मुंबई पोलिसांनी दमण येथील एका फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले होते. यामुळे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ...

मुंबई पोलिसांनी दमण येथील एका फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले होते. यामुळे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. याबाबत महसूलमंत्री थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना टोला लगावला. थोरात हे रविवारी (दि. १८) संगमनेरात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पोलिसांनी काही चुकीचे केले असले तर त्यांची चौकशी करावी. मला वाटत नाही पोलिसांनी काही चुकीचे केले असेल जे काही केले ते जनतेच्या हिताकरिता केले. मात्र, राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात बसण्याऐवजी दोन दिवस दिल्लीला गेले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला खूप मदत झाली असती.

रेमडेसिविर इंजेक्शनबाबत बोलताना थोरात म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शनचा फार दिवस तुटवडा राहील, अशी परिस्थिती आता राहिली नाही. ते आता उपलब्ध होत आहेत. फक्त त्यात कुणी अडचणी आणू नये. एवढीच अपेक्षा आहे. काळजीपूर्वक त्याचा वापर करावा. गरज आहे त्यालाच हे इंजेक्शन दिले पाहिजे. त्यात साठेबाजी नको. असे केले तर इंजेक्शन कमी पडणार नाही. असेही थोरात म्हणाले.

--------------

हे १५ दिवस आपला जीव वाचविणारे

लॉकडाऊनचे फायदे-तोटे आपल्याला माहीत आहेत. कदाचित १५ दिवसांचा काळ आपल्याला कठीण काढावा लागेल, घरातच बसावे लागेल. हे १५ दिवस आपला जीव वाचविणार असतील तर ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. संकटाचा काळ आहे. सरकारने दंडुका घ्यावा अन् मग लॉकडाऊन व्हावे, अशी सरकारची इच्छा नाही. नागरिकांनी साथ द्यावी आणि नियम पाळावे. स्वत:चा जीव वाचवावा, असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.