शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दिलदार मनाचा शेतकरी : सरकारला दिले दहा टन पेरूचे दान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:29 IST

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.  या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीतील दहा टन पेरू अंदाजे किंमत सात लाख रुपयांचा माल शासनाला दान केला आहे. 

अशोक निमोणकर /जामखेड : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.  या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीतील दहा टन पेरू अंदाजे किंमत सात लाख रुपयांचा माल शासनाला दान केला आहे. शिऊर येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांची माळरानावर सहा एकर शेती आहे. बरडाची शेती पडीक पडण्यापेक्षा या ठिकाणी विहीर खोदून अडीच वर्षांपूर्वी सरदार जातीचे पेरुची त्यांनी लागवड केली. हाडाचे शेतकरी असल्याने योग्य नियोजन व वेळोवेळी सेंद्रिय पध्दतीने खते व औषधे मारून पेरूबाग फुलवला आहे. या पेरूचे प्रत्येक फळ ३०० ग्रॅम वजनाचे असून फळांनी पेरूबाग बहरला आहे.       कोरोनामुळे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. सध्या संपूर्ण फळबागा मार्केट बंद आहे. संदीपान निंबाळकर या शेतकºयाचा पेरू पूर्ण काढण्याच्या अवस्थेत आहे. परंतू बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने गाई-गुरांना पेरू खाऊ घालावा लागत आहे. अशा परस्थितीमध्ये पेरूचे पैसे तर होणारच नाहीत. तो सोन्यासारखा माल नासून जाण्यापेक्षा माणसांच्या मुखात जावा अशी भावना निंबाळकर यांनी व्यक्त केली. अडीच वर्षे फुलवलेल्या या फळबागेसाठी आतापर्यंत चार लाखाच्या आसपास खर्च केला. हा खर्च सहन करून त्यांनी संपूर्ण पेरूची १० टनाची बाग सात लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना कोरोनासारख्या संकटाप्रसंगी सरकारला दान करण्याचा संकल्प त्यांनी केला.      निंबाळकर यांनी शिवूरचे उपसरपंच सिध्देश्वर लटके यांच्याशी चर्चा केली. तत्काळ   तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांच्याबरोबर संपर्क साधला. ते तत्काळ शिऊर येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांच्या शेतात जाऊन पेरू बागेची पाहणी केली. यावेळी कामगार तलाठी सचिन खिळे, गणेश निकम, आजिनाथ निकम, बदाम निंबाळकर, नाना सावंत, महादेव झरकर, वसंत निंबाळकर, एकनाथ चव्हाण उपस्थित होते.  

 जामखेड तालुक्यातील गोरगरिब जनतेला, विविध भागातील विधवा, मजूर, दिव्यांग, वयोवृद्ध, गरिब व्यक्तींना हा पेरू कसा पोहोच करता येईल? याचे नियोजन करण्यात येईल. शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचे दु:ख तर आहेच. त्याचबरोबर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक आहे.  -विशाल नाईकवाडे, तहसिलदार, जामखेड. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडFarmerशेतकरी