शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

दिलदार मनाचा शेतकरी : सरकारला दिले दहा टन पेरूचे दान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:29 IST

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.  या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीतील दहा टन पेरू अंदाजे किंमत सात लाख रुपयांचा माल शासनाला दान केला आहे. 

अशोक निमोणकर /जामखेड : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.  या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीतील दहा टन पेरू अंदाजे किंमत सात लाख रुपयांचा माल शासनाला दान केला आहे. शिऊर येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांची माळरानावर सहा एकर शेती आहे. बरडाची शेती पडीक पडण्यापेक्षा या ठिकाणी विहीर खोदून अडीच वर्षांपूर्वी सरदार जातीचे पेरुची त्यांनी लागवड केली. हाडाचे शेतकरी असल्याने योग्य नियोजन व वेळोवेळी सेंद्रिय पध्दतीने खते व औषधे मारून पेरूबाग फुलवला आहे. या पेरूचे प्रत्येक फळ ३०० ग्रॅम वजनाचे असून फळांनी पेरूबाग बहरला आहे.       कोरोनामुळे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. सध्या संपूर्ण फळबागा मार्केट बंद आहे. संदीपान निंबाळकर या शेतकºयाचा पेरू पूर्ण काढण्याच्या अवस्थेत आहे. परंतू बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने गाई-गुरांना पेरू खाऊ घालावा लागत आहे. अशा परस्थितीमध्ये पेरूचे पैसे तर होणारच नाहीत. तो सोन्यासारखा माल नासून जाण्यापेक्षा माणसांच्या मुखात जावा अशी भावना निंबाळकर यांनी व्यक्त केली. अडीच वर्षे फुलवलेल्या या फळबागेसाठी आतापर्यंत चार लाखाच्या आसपास खर्च केला. हा खर्च सहन करून त्यांनी संपूर्ण पेरूची १० टनाची बाग सात लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना कोरोनासारख्या संकटाप्रसंगी सरकारला दान करण्याचा संकल्प त्यांनी केला.      निंबाळकर यांनी शिवूरचे उपसरपंच सिध्देश्वर लटके यांच्याशी चर्चा केली. तत्काळ   तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांच्याबरोबर संपर्क साधला. ते तत्काळ शिऊर येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांच्या शेतात जाऊन पेरू बागेची पाहणी केली. यावेळी कामगार तलाठी सचिन खिळे, गणेश निकम, आजिनाथ निकम, बदाम निंबाळकर, नाना सावंत, महादेव झरकर, वसंत निंबाळकर, एकनाथ चव्हाण उपस्थित होते.  

 जामखेड तालुक्यातील गोरगरिब जनतेला, विविध भागातील विधवा, मजूर, दिव्यांग, वयोवृद्ध, गरिब व्यक्तींना हा पेरू कसा पोहोच करता येईल? याचे नियोजन करण्यात येईल. शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचे दु:ख तर आहेच. त्याचबरोबर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक आहे.  -विशाल नाईकवाडे, तहसिलदार, जामखेड. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडFarmerशेतकरी