शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

दिलदार मनाचा शेतकरी : सरकारला दिले दहा टन पेरूचे दान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:29 IST

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.  या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीतील दहा टन पेरू अंदाजे किंमत सात लाख रुपयांचा माल शासनाला दान केला आहे. 

अशोक निमोणकर /जामखेड : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.  या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीतील दहा टन पेरू अंदाजे किंमत सात लाख रुपयांचा माल शासनाला दान केला आहे. शिऊर येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांची माळरानावर सहा एकर शेती आहे. बरडाची शेती पडीक पडण्यापेक्षा या ठिकाणी विहीर खोदून अडीच वर्षांपूर्वी सरदार जातीचे पेरुची त्यांनी लागवड केली. हाडाचे शेतकरी असल्याने योग्य नियोजन व वेळोवेळी सेंद्रिय पध्दतीने खते व औषधे मारून पेरूबाग फुलवला आहे. या पेरूचे प्रत्येक फळ ३०० ग्रॅम वजनाचे असून फळांनी पेरूबाग बहरला आहे.       कोरोनामुळे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. सध्या संपूर्ण फळबागा मार्केट बंद आहे. संदीपान निंबाळकर या शेतकºयाचा पेरू पूर्ण काढण्याच्या अवस्थेत आहे. परंतू बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने गाई-गुरांना पेरू खाऊ घालावा लागत आहे. अशा परस्थितीमध्ये पेरूचे पैसे तर होणारच नाहीत. तो सोन्यासारखा माल नासून जाण्यापेक्षा माणसांच्या मुखात जावा अशी भावना निंबाळकर यांनी व्यक्त केली. अडीच वर्षे फुलवलेल्या या फळबागेसाठी आतापर्यंत चार लाखाच्या आसपास खर्च केला. हा खर्च सहन करून त्यांनी संपूर्ण पेरूची १० टनाची बाग सात लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना कोरोनासारख्या संकटाप्रसंगी सरकारला दान करण्याचा संकल्प त्यांनी केला.      निंबाळकर यांनी शिवूरचे उपसरपंच सिध्देश्वर लटके यांच्याशी चर्चा केली. तत्काळ   तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांच्याबरोबर संपर्क साधला. ते तत्काळ शिऊर येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांच्या शेतात जाऊन पेरू बागेची पाहणी केली. यावेळी कामगार तलाठी सचिन खिळे, गणेश निकम, आजिनाथ निकम, बदाम निंबाळकर, नाना सावंत, महादेव झरकर, वसंत निंबाळकर, एकनाथ चव्हाण उपस्थित होते.  

 जामखेड तालुक्यातील गोरगरिब जनतेला, विविध भागातील विधवा, मजूर, दिव्यांग, वयोवृद्ध, गरिब व्यक्तींना हा पेरू कसा पोहोच करता येईल? याचे नियोजन करण्यात येईल. शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचे दु:ख तर आहेच. त्याचबरोबर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक आहे.  -विशाल नाईकवाडे, तहसिलदार, जामखेड. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडFarmerशेतकरी