शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पारधी कुटुंबाच्या हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या; आदिवासी भटके विमुक्त आघाडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:51 IST

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांग वडगाव येथील पारधी समाजातील तिघांची हत्या करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा. तसेच हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या वारसांना आरोपी निंबाळकरांची संपत्ती विकून प्रत्येकी १५ लाख रुपये मदत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक प्रा.किसन चव्हाण व सह समन्वयक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

अहमदनगर : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांग वडगाव येथील पारधी समाजातील तिघांची हत्या करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा. तसेच हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या वारसांना आरोपी निंबाळकरांची संपत्ती विकून प्रत्येकी १५ लाख रुपये मदत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक प्रा.किसन चव्हाण व सह समन्वयक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.याबाबत मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार, व संजय बाबू पवार या तिघांच्या हत्याकांडाची चौकशी सी.आय.डी.मार्फत करावी. याप्रकरणी कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करणा-या युसूफ वडगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करावेत. पवार कुटुंबियांना गोड बोलून जमिनीचा ताबा घेण्यासाठी बोलविणा-या सरपंच व त्याच्या साथीदारांना याप्रकरणात सहआरोपी करावे.बाबू पवार यांच्यासह त्यांची दोन मुले प्रकाश व संजय या तिघा बाप लेकांची १३ मे रोजी शेतीच्या वादातून सुरुवातीला अंगावर ट्रॅक्टर घालून, जायबंदी करून व नंतर तलवार व कुºहाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. निंबाळकर कुटुंबीय कसत असलेल्या शेत जमिनीचा निकाल पवार कुटुंबियांच्या बाजूने लागला. या रागातून नियोजनबद्ध पध्दतीने हे हत्याकांड करण्यात आले. मांग वडगाव या गावाला फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचा वारसा आहे. तेथे पारधी व मातंग समाजातील काही कुटुंबांनी एकत्र येऊन गायरान जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे. याकामी मानवी हक्क अभियानचे अ‍ॅड. एकनाथ आव्हाड, विश्वनाथ तोडकर व रमेश भिसे यांनी त्यांना गायरान जमिनी मिळवून देण्यासाठी लढा पुकारला होता.उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथे १९७७ साली शेताच्या वादावरून पारधी समाजातील ११ जणांना जाळपोळ करून ठार मारले होते. या हत्याकांडात तेथील बड्या राजकीय कुटुंबाचा प्रत्यक्ष सहभाग होता. या हत्याकांडानंतर त्या परिसरातील पारधी समाजातील अनेक कुटुंबांनी इतरत्र स्थलांतर केले होते. त्यापैकी बाबू पवार यांचे कुटुंब मांग वडगाव येथे वास्तव्यास आले होते. तेथेही पवार व निंबाळकर कुटुंबीयांचा शेत जमिनीवरून वाद झाला होता. व त्यात निंबाळकर कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या खुनाचा सूड घेण्यासाठी निंबाळकर कुटुंबाने १३ मे रोजी हे हत्याकांड घडवून आणले. याबाबत युसूफ वडगाव पोलिस ठाण्याला पूर्वकल्पना देऊनही त्यांनी पवार कुटुंबाला संरक्षण देण्याऐवजी निंबाळकर कुटुंबाची पाठराखण केली. त्यामुळे हे हत्याकांड घडले. या घटनेत कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर देखील कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति गृहमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी भटके विमुक्त आयोग यांना देखील पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. जालिंदर घिगे यांनी दिली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस