शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पालकमंत्र्यांनी नगर जिल्हा विभाजनाचा अभ्यास करावा - सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 15:05 IST

जिल्हा विभाजनासाठी किती पैसे लागतात, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवायची का? जिल्हा विभाजनाचा सामाजिक फायदा काय, याचा अभ्यास पालकमंत्री राम शिंदे यांनी करावा, असे आव्हान डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

जामखेड : सरकारला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे तीनशे कोटी रुपये देण्यासाठी पैसे नाहीत. जिल्हा विभाजनासाठी किती पैसे लागतात, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवायची का? जिल्हा विभाजनाचा सामाजिक फायदा काय, याचा अभ्यास पालकमंत्री राम शिंदे यांनी करावा आणि मगच जिल्हा विभाजनाबाबत बोलावे, असे जाहीर आव्हान युवक नेते व जनसेवा फाउंशनचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.जामखेड तालुक्यातील राजकीय पदाधिकारी यांची पालकमंत्र्यांबरोबर कोणाची सेटिंग आहे. याचे आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे. वेळ आल्यावर उघड करू, असा दम त्यांनी कार्यक्रमाला अनुपस्थित राहणा-या राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्ते यांना दिला आहे. जामखेड येथे जनसेवा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी सुजय विखे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ होते. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर राळेभात,अंकुश ढवळे, अरुण वराट, बंकटराव बारवकर, किसनराव ढवळे, भारत काकडे, सुनील शिंदे, गजानन फुटाणे, मकरंद काशिद, अरुण जाधव, विशाल डुचे, मंगला भुजबळ, ज्योती गोलेकर, अरुण जाधव, नगरसेवक अमित जाधव, कैलास वराट, अशोक गिरमे उपस्थित होते.यावेळी डॉ. विखे म्हणाले, मी मूळ राजकारणी नाही. जिल्हा विभाजनावर जिल्ह्यातील एकही पुढारी बोलत नाही. फक्त पालकमंत्री बोलत आहेत. त्यांना विभाजन करून काय साध्य करायचे आहे, तेच कळत नाही. या विषयामुळे शिंदे इतर प्रश्न विसरून गेले आहेत. विभाजन करण्याअगोदर जामखेड तालुक्यातील एमआयडीसी, कुकडीचे पाणी, युवकांना रोजगार, तालुक्यातील प्रमुख कार्यालयांत असणारे प्रभारी अधिकारी राज संपवा व शेतक-यांना कर्जमाफीचे पैसे द्या, असे ते म्हणाले.

एक कोटींचा निधी आणला

मी अजून उमेदवारीची घोषणा केली नाही. माझा पवित्रा सावध राहणार आहे. जनतेला चांगला पर्याय मिळाला तर नक्की जनता स्वीकारते. राजकारणात आश्वासनापलीकडे जाऊन काम केले पाहिजे. आज जामखेडला येत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक कोटी निधी आणला आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कामे केली जाणार आहेत, असे विखे पाटील म्हणाले.

टॅग्स :Ram Shindeराम शिंदेSujay Vikheसुजय विखेAhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड