शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करणार - पालकमंत्री राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:05 IST

गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यात नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली असून, जामखेड व केडगाव हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांना तत्काळ जेरबंद केले जाईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर येथे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

अहमदनगर : गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यात नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली असून, जामखेड व केडगाव हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांना तत्काळ जेरबंद केले जाईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर येथे माध्यमांशी बोलतांना सांगितले.

शिंदे म्हणाले जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. गावठी कट्यातून खूनाच्या घटना घडतात ही दुर्दैवी बाब आहे. अवैधरित्या जवळ हत्यार बाळगणा-यांवर आता कडक कारवाई होणार आहे. संघटित गुन्हेगारी करणा-यांवरही मोक्का, एमपीडीतंर्गत कारवाई केली जाईल. अवैध व्यवसायाबाबत नागरिकांनीही पोलीसांना माहिती द्यावी. माहिती देणा-या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवून कारवाई केली जाईल. जिल्ह्यात ज्या पोलीस निरिक्षिकाच्या हद्दीत अवैध हत्यात तस्करी आढळून येईल त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटना दुर्दैवी आहेत. जामखेड हत्याकांडातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींचा १५ पथकांच्या माध्यमातून शोध सुरू आहे तसेच या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करण्यासाठी विशेष चार टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत. या घटनेतील सर्व आरोपी लवकरच जेरबंद होऊन त्यांना कठोर शासन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडJamkhedजामखेड