शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री तनपुरे, गडाख यांच्याविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी, शेतकऱ्यांनी दिला आंदोलनालचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:32 IST

मुळा नदीकाठच्या कार्यक्षेत्रात दोन मंत्री आहेत. राहुरी मतदारसंघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नेवासा मतदारसंघात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन मंत्री असूनदेखील बंधारे कोरडेठाक का? असा संतप्त सवाल लाभधारक शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

राहुरी : राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील बंधारे मुळा धरणातून तत्काळ भरून द्यावी, अन्यथा कुठल्याही क्षणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. मुळा नदीकाठच्या कार्यक्षेत्रात दोन मंत्री आहेत. राहुरी मतदारसंघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नेवासा मतदारसंघात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन मंत्री असूनदेखील बंधारे कोरडेठाक का? असा संतप्त सवाल लाभधारक शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

मुळा धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नदीकाठ उजाड झाला आहे. शेती, पिण्याचे पाणी, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी सुटेल या आशेने शेतकऱ्यांना बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये लोकवर्गणीतून जमा केले. मात्र पाणी सुटण्याची आशा धुसर झाल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांच्या काळात हे बंधारे भरले होते. आता विद्यमान मंत्र्यांकडून शेतीचा महत्त्वाचा पाणी प्रश्न भिजत पडला आहे. या दोन्ही मंत्र्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन हे बंधारे तत्काळ भरावेत, अशी मागणी दत्तात्रय घोलप, कृपाचार्य जाधव, नानासाहेब जुंधारे, शिवाजी जाधव, युवराज पवार, श्रीराम तुवर, विठ्ठल जाधव, ब्रह्मदेव जाधव, विठ्ठल जाधव, दादा राजळे, वैभव जरे, योगेश बनकर, राजू जंगले, विजय जंगले, संतोष नवगिरे, अशोक टेमक, विलास सैंदोरे, भाऊसाहेब विटनोर आदींसह अंमळनेर, करजगाव, पानेगाव, शिरेगाव, खेडले परमानंद, पिंप्री-वळण, चंडकापूर, केंदळ, मानोरी, वळण, मांजरी, आरडगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांनी हे बंधारे आठ दिवसात भरून द्यावेत, अशी मागणी केली आहे.

आंदोलनाचा इशारा

सध्या मे महिन्याचा कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामध्ये पिण्याचा प्रश्न, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात असूनसुद्धा बंधारे कोरडेठाक का? लवकरात लवकर बंधारे भरून मिळावेत. बंधारे आठ दिवसांच्या आत भरले नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेNevasaनेवासाShankarrao Gadakhशंकरराव गडाख