शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

शेतक-यांवर गोळीबार करुनच सरकारला शेवगावमधील आंदोलन दडपावयाचे होते - विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 15:15 IST

जाणिवपूर्वक बळाचा वापर करुन शेतक-यांचे आंदोलन चिरडू शकतो, असा सरकारचा विचार होता. त्यामुळेच शेवगाव तालुक्यातील शेतक-यांवर गोळीबार करण्याचा प्रकार घडला, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.

अहमदनगर : जाणिवपूर्वक बळाचा वापर करुन शेतक-यांचे आंदोलन चिरडू शकतो, असा सरकारचा विचार होता. त्यामुळेच शेवगाव तालुक्यातील शेतक-यांवर गोळीबार करण्याचा प्रकार घडला, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.ऊस दरावरुन चिघळलेल्या आंदोलनातील शेतक-यांवर बुधवारी (दि. १५) पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यात जखमी झालेल्या शेतक-यांवर नगरमधील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गुरुवारी दुपारी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जखमींची हॉस्टिपलमध्ये जाऊन भेट घेतली.विखे म्हणाले, शेतक-यांवर गोळीबार करणे चुकीचे आहे. निंदनीय आहे. हे प्रशासनाचे अपयश आहे. सांगलीत पोलीस कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाला. हे गृहखात्याचे अपयश आहे. गृहखाते प्रभारी असल्यामुळेच राज्याला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जाणिवपूर्वक बळाचा वापर करुन शेतक-यांचे आंदोलन चिरडू शकतो, असा सरकारचा विचार होता. त्यामुळेच हा प्रकार घडला. जिल्ह्याचा पालकमंत्रीही याची दखल घेत नाही. शासनाच्या संवेदनाच हरवल्या आहेत. कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटले. मात्र शेतक-यांचे कर्ज माफ झालेच नाही. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. रोज सरकार योजनांच्या घोषणा करीत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच कालची घटना घडली.एफआरपीप्रमाणे कारखान्यांनी भाव देणे बंधनकारक आहे. जे कारखान्याचे याचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. पण सरकार काही करीत नाही. एफआरपीपेक्षा जास्त भाव देण्याची मागणी होत आहे. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार दर द्यावा. पण सरकार हे करीत नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार