सरकारी कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मोर्चा

By Admin | Updated: June 15, 2014 00:31 IST2014-06-14T23:09:09+5:302014-06-15T00:31:11+5:30

अहमदनगर : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आतापर्यंत वेळोवेळी दिलेले आश्वासन पाळलेले नाही. सरकारच्या नकारात्मक धोरणांचा निषेध करण्यासाठी

Government employees' Tuesday front | सरकारी कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मोर्चा

सरकारी कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मोर्चा

अहमदनगर : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आतापर्यंत वेळोवेळी दिलेले आश्वासन पाळलेले नाही. सरकारच्या नकारात्मक धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मंगळवार (दि.१७)ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती योगीराज खोंडे यांनी दिली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात खोंडे यांनी स्पष्ट केले की, फेबु्रवारी महिन्यात राज्य सरकारी, निमसरकारी अधिकारी, कर्मचारी शिक्षक समन्वय समितीच्या वतीने बेमुदत संपाची हाक दिली होती. त्यावेळी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यामुळे संप रद्द करण्यात आला होता.
मात्र, त्यावेळी दिलेला शब्द सरकारने पाळलेला नाही. कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ, महिला कर्मचाऱ्यांना संगोपन रजा, केंद्राप्रमाणे शैक्षणिक भत्ता, निवृत्तीचे वय ६०, रिक्त पदे भरणे, केंद्राप्रमाणे आरोग्य सुविधा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा तीनशे रुपये आरोग्य भत्ता आदी मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत.
कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांसाठी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Government employees' Tuesday front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.