शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारला रस्ता सापडला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST

अहमदनगर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापुराने हाहाकार माजलेला असताना तेथील पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारला रस्ता सापडला नाही. ...

अहमदनगर : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापुराने हाहाकार माजलेला असताना तेथील पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारला रस्ता सापडला नाही. यंत्रणेच्या आधी भाजपचे पदाधिकारी तिथे पोहोचले. मंत्रालय ते पंढरपूर या रस्त्यावर दिसलेले मुख्यमंत्र्यांचे ड्रायव्हिंग स्किल कोकणात पूरग्रस्तांच्या मदतीला जाताना बघायचे होते. मात्र पूरग्रस्तांना वाचविण्यात, मदत करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

येथील भाजपच्या कार्यालयात शनिवारी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पत्रकार परिषद सुरू असताना मुख्यमंत्री महाड तालुक्यातील तळिये गावात पोहोचल्याचे कळाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला पाहिजे, असे सांगत वाघ म्हणाल्या, आजकाल मुख्यमंत्री मंत्रालयात येतात, ही सुद्धा माध्यमांची बातमी बनते, याचे आश्चर्य आहे. कोणतेही संकट आले की केंद्र सरकारडे बोट दाखविले जाते. त्यात खासदार संजय राऊत आघाडीवर असतात. केवळ एकमेकांना सांभाळणे म्हणजे सरकार चालविणे नाही. लोकांच्या समस्या सोडविण्यापेक्षा सरकार पाच वर्ष टिकेल की नाही, याचीच चिंता मंत्र्यांना आहे. त्यामु‌ळेच आमचे सरकार पाच वर्ष टिकणार आहे, असे मंत्र्यांना वारंवार सांगावे लागत आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे पळकुटे मंत्री आहेत. चिपळूण तालुक्यातील नागरिक संकटात असताना ते तेथून पळून आले. मुख्यमंत्री ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ सांभाळण्यात व्यस्त आहेत, अशीची टीका त्यांनी केली.

---------

शरद पवार गुरुस्थानी

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर वाघ म्हणाल्या, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मला गुरूस्थानी आहेत. गुरुपद हे अढळ पद असते. राष्ट्रवादीतून बाहेर पडतानाही त्यांच्याच पायावर डोके ठेवून बाहेर पडले. भाजपात असले तरीही गुरू-शिष्य हे नाते अबाधित आहे.

---------

अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

नगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस तक्रार घेत नाहीत. तक्रार दिली तर त्यावर गुन्हा दाखल होत नाही. गुन्हा दाखल झाला तर कारवाई होत नाही. राज्यातही अशाच घटना वाढल्या आहेत. नगर जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत मी संबंधित कुटुंबांशी चर्चा केली आहे. पोलीस अधीक्षकांशी भेटून याबाबत कारवाई करण्याची मागणी करणार आहे. राज्यात महिला पोलिसांवरच अत्याचाराची प्रकरणे घडली असून ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. महिला पोलिसांचेच रक्षण न करणारे पोलीस खाते जनतेने रक्षण काय करणार असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.