शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

नागरिकत्वाचा पुरावा नसताना मिळाले हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला असा कोणताच अधिवासाचा पुरावा नसतानाही ६० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला असा कोणताच अधिवासाचा पुरावा नसतानाही ६० आदिवासी कुटुंबांना हक्काचे घर देण्याचे मॉडेल नगर शहराजवळ खारेकर्जुने येथे साकारले आहे. लष्कराच्या देशातील सर्वांत मोठ्या रणगाडा प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात बेघर म्हणून राहणाऱ्या या कुटुंबांसाठी हा मोठा दिलासा आहे.

अहमदनगर शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर कर्जुने खारे हे ३ हजार लोकसंख्येचे गाव आहे. भारतीय सैन्यातील रणगाड्यांचा बॉम्ब गोळा फेकण्याचा सराव या भागात चालतो. या क्षेत्राशेजारीच हे गाव वसलेले आहे. गावात सुमारे ८० ते ९० आदिवासी कुटुंबे आहेत. यापैकी अनेकांची दगड, मातीची कच्ची घरे ही लष्कराच्या हद्दीत होती. सैन्याच्या सरावादरम्यान या कुटुंबातील अनेकांना इजा झाली, तर काहींना प्राण गमवावे लागले; पण राहण्यासाठी जागाच नसल्याने धोका पत्करून ते राहत होते. ही कुटुंबे हातावर पोट भरणारी आहेत. त्यांच्याकडे स्वत:ची जागा नसल्याने शासकीय योजनेतून घर मिळत नव्हते. त्यामुळे ग्रामपंचायतीने विशेष शिबिर घेत त्यांना जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला मिळवून दिला. बँकेत पती-पत्नीचे एकत्रित खाते उघडले. त्यानंतर पंचायतीने शबरी आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजना अशा विविध योजना एकत्र करून या आदिवासींसाठी रणगाडा क्षेत्रापासून सुरक्षित अंतरावर वसाहत उभारली.

......................................

अशी आहे शबरी नगर वसाहत

प्रत्येक घरात हॉल, किचन, बाथरूम अशी रचना आहे. स्वतंत्र नळ कनेक्शन, घरासमोर डांबरी रस्ता, ड्रेनेज लाइन आहे. एक रुपयाही खर्च न करता एका कुटुंबासाठी विविध योजनांचा मिळून २ लाख रुपयांचा लाभ मिळाला. घराचे काम सुरू असतानाच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून या कुटुंबांना रोजगारही मिळाला. त्या रकमेतून घरात फर्शी बसली.

..............

जागा उधारीची, बांधकामही उधारीवरच

आदिवासी कुटुंबापैकी एकाकडेही जमीन मालकाला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी एका शेतकऱ्याला उधारीवर जागा देण्याची विनंती केली. गोरख शेळके या शेतकऱ्यानेही उधारीवर जागा दिली. पंडित दीनदयाळ योजनेचा लाभ मिळाल्यानंतर आदिवासींनी या शेतकऱ्याला मोबदला दिला. ठेकेदाराने देखील एक रुपयाही अगोदर न घेता एकाच वेळी ६० घरांचे काम सुरू केले. टप्प्याटप्प्याने शबरी आवास योजनेचे अनुदान आल्यानंतर लाभार्थ्यांनी ठेकेदाराला पैसे दिले.

...............

ते झाले नागरिक

Default Media And Templates

Image's

Template's

Video's

ना जातीचा व रहिवासाचा दाखला, ना रेशन कार्ड. त्यामुळे घर तर दूरच आपण नागरिक म्हणून तरी गणले जाऊ का? ही चिंता या आदिवासी कुटुंबांना होती. मात्र, सरपंच प्रभाकर मगर, ग्रामसेविका प्रियंका भोर यांनी आदिवासींना विश्वास दिला. त्यामुळे त्यांना दाखलेही मिळाले व हक्काची घरेही.