शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

फसव्या सरकारविरोधात जनतेचा रोष - सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:02 IST

कर्जमाफीच्या रकमा, बोंडअळीची नुकसान भरपाई देण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नव्हते. राष्ट्रवादीने सुरु केलेल्या आंदोलनानंतर कर्जमाफीचे पैसे जमा करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारने केला. आता फसव्या सरकारच्या विरोधातील रोष संघटित होत आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

अहमदनगर : कर्जमाफीच्या रकमा, बोंडअळीची नुकसान भरपाई देण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नव्हते. राष्ट्रवादीने सुरु केलेल्या आंदोलनानंतर कर्जमाफीचे पैसे जमा करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारने केला. आता फसव्या सरकारच्या विरोधातील रोष संघटित होत आहे, असे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले.हल्लाबोल यात्रेला नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून आज, बुधवारी प्रारंभ झाला. त्यानंतर नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. तटकरे म्हणाले, सरकारचे अजूनही डोळे उघडत नाहीत. कापसाच्या नुकसानीचे पैसे सरकारकडून अद्याप मिळालेले नाहीत. सरकार शेतक-यांसाठी काहीही करीत नाही. सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलनाचा हा तिसरा टप्पा आहे.रोजगार न मिळाल्यामुळे सरकारकडून तरुणांची फसवणूक होत आहे, अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दीडपट हमीभाव, दोन कोटी रोजगार ही सर्व फसवी आश्वासने आहेत. सरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात जनमानस एकवटत आहे. आता आम्ही विभागीय आयुक्तालयावर हल्लाबोल करणार आहोत, असे तटकरे यांनी सांगितले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसेपाटील, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते.

पाथर्डीमध्ये पीआयनेच कट रचला. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. राज्याला मागे नेणारे भाजप सरकारचे काम करीत आहे. सध्या आठ लाख कोटी कर्ज राज्यावर झाले आहे. उत्पन्न घटले आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर टीका केली.पवार म्हणाले, जे जे पक्ष येतील, त्यांना मान दिला जाईल. भाजप - सेना हाच प्रमुख विरोधक आहे. जिल्हा विभाजन सोपे नाही़ त्यासाठी आर्थिक भार सोसण्याची ताकद सरकारची असावी लागते़ जिल्हा विभाजन हा चुनावी जुमला आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा डाव आहे. चार वर्षात सरकारने काय दिवे लावले ते सांगा, कोणते आश्वासन पाळले, ते सांगा़ फक्त आपल्या देशात पेट्रोल महाग आहे. या सरकारवरचा सगळ्यांचा विश्वास उडाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस