शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

फसव्या सरकारविरोधात जनतेचा रोष - सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:02 IST

कर्जमाफीच्या रकमा, बोंडअळीची नुकसान भरपाई देण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नव्हते. राष्ट्रवादीने सुरु केलेल्या आंदोलनानंतर कर्जमाफीचे पैसे जमा करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारने केला. आता फसव्या सरकारच्या विरोधातील रोष संघटित होत आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

अहमदनगर : कर्जमाफीच्या रकमा, बोंडअळीची नुकसान भरपाई देण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नव्हते. राष्ट्रवादीने सुरु केलेल्या आंदोलनानंतर कर्जमाफीचे पैसे जमा करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारने केला. आता फसव्या सरकारच्या विरोधातील रोष संघटित होत आहे, असे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले.हल्लाबोल यात्रेला नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून आज, बुधवारी प्रारंभ झाला. त्यानंतर नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. तटकरे म्हणाले, सरकारचे अजूनही डोळे उघडत नाहीत. कापसाच्या नुकसानीचे पैसे सरकारकडून अद्याप मिळालेले नाहीत. सरकार शेतक-यांसाठी काहीही करीत नाही. सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलनाचा हा तिसरा टप्पा आहे.रोजगार न मिळाल्यामुळे सरकारकडून तरुणांची फसवणूक होत आहे, अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दीडपट हमीभाव, दोन कोटी रोजगार ही सर्व फसवी आश्वासने आहेत. सरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात जनमानस एकवटत आहे. आता आम्ही विभागीय आयुक्तालयावर हल्लाबोल करणार आहोत, असे तटकरे यांनी सांगितले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसेपाटील, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते.

पाथर्डीमध्ये पीआयनेच कट रचला. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. राज्याला मागे नेणारे भाजप सरकारचे काम करीत आहे. सध्या आठ लाख कोटी कर्ज राज्यावर झाले आहे. उत्पन्न घटले आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर टीका केली.पवार म्हणाले, जे जे पक्ष येतील, त्यांना मान दिला जाईल. भाजप - सेना हाच प्रमुख विरोधक आहे. जिल्हा विभाजन सोपे नाही़ त्यासाठी आर्थिक भार सोसण्याची ताकद सरकारची असावी लागते़ जिल्हा विभाजन हा चुनावी जुमला आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा डाव आहे. चार वर्षात सरकारने काय दिवे लावले ते सांगा, कोणते आश्वासन पाळले, ते सांगा़ फक्त आपल्या देशात पेट्रोल महाग आहे. या सरकारवरचा सगळ्यांचा विश्वास उडाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस