शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

फसव्या सरकारविरोधात जनतेचा रोष - सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:02 IST

कर्जमाफीच्या रकमा, बोंडअळीची नुकसान भरपाई देण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नव्हते. राष्ट्रवादीने सुरु केलेल्या आंदोलनानंतर कर्जमाफीचे पैसे जमा करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारने केला. आता फसव्या सरकारच्या विरोधातील रोष संघटित होत आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

अहमदनगर : कर्जमाफीच्या रकमा, बोंडअळीची नुकसान भरपाई देण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नव्हते. राष्ट्रवादीने सुरु केलेल्या आंदोलनानंतर कर्जमाफीचे पैसे जमा करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारने केला. आता फसव्या सरकारच्या विरोधातील रोष संघटित होत आहे, असे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले.हल्लाबोल यात्रेला नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून आज, बुधवारी प्रारंभ झाला. त्यानंतर नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. तटकरे म्हणाले, सरकारचे अजूनही डोळे उघडत नाहीत. कापसाच्या नुकसानीचे पैसे सरकारकडून अद्याप मिळालेले नाहीत. सरकार शेतक-यांसाठी काहीही करीत नाही. सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलनाचा हा तिसरा टप्पा आहे.रोजगार न मिळाल्यामुळे सरकारकडून तरुणांची फसवणूक होत आहे, अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दीडपट हमीभाव, दोन कोटी रोजगार ही सर्व फसवी आश्वासने आहेत. सरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात जनमानस एकवटत आहे. आता आम्ही विभागीय आयुक्तालयावर हल्लाबोल करणार आहोत, असे तटकरे यांनी सांगितले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसेपाटील, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते.

पाथर्डीमध्ये पीआयनेच कट रचला. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. राज्याला मागे नेणारे भाजप सरकारचे काम करीत आहे. सध्या आठ लाख कोटी कर्ज राज्यावर झाले आहे. उत्पन्न घटले आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर टीका केली.पवार म्हणाले, जे जे पक्ष येतील, त्यांना मान दिला जाईल. भाजप - सेना हाच प्रमुख विरोधक आहे. जिल्हा विभाजन सोपे नाही़ त्यासाठी आर्थिक भार सोसण्याची ताकद सरकारची असावी लागते़ जिल्हा विभाजन हा चुनावी जुमला आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा डाव आहे. चार वर्षात सरकारने काय दिवे लावले ते सांगा, कोणते आश्वासन पाळले, ते सांगा़ फक्त आपल्या देशात पेट्रोल महाग आहे. या सरकारवरचा सगळ्यांचा विश्वास उडाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस