शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकारमध्ये शेतक-यांची मुले हवीत-सचिन पायलट;  खांडेकर, गांधी, शेरकर यांना संगमनेरात पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 18:30 IST

देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतक-यांची मुले पाहिजेत. त्यांनी शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम केले पाहिजे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले. 

संगमनेर : देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतक-यांची मुले पाहिजेत. त्यांनी शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम केले पाहिजे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ््यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभचे अध्यक्ष नाना पटोले होते. व्यासपीठावर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, डॉ. गिरीश गांधी, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार डॉ.किरण लहामटे, आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. पायलट पुढे म्हणाले, महाराष्ट्र व राजस्थानचे पुर्वीपासूनचे विश्वासाचे दृढ नाते आहे.  महसूलमंत्री थोरात यांच्यातील नम्रता व प्रत्येकाच्या हदयातील असणारे स्थान हे नव्या पिढीसाठी अनुकरणीय आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केलेल्या रचनात्मक व दिशादर्शक कामामुळे नगरचे नाव देशपातळीवर आहे. खांडेकर, गांधी, शेरकर यांना पुरस्कारअमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणा-या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व एक लाख रुपये रोख रक्कम एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना प्रदान करण्यात आला. डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार व एक लाख रुपये रोख रक्कम. पर्यावरणामध्ये डॉ. गिरीश गांधी यांना तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सत्यशील व योगिता शेरकर यांना स्मृतीचिन्ह व एकावन्न हजार रुपयांची रोख रक्कम या पुरस्काराने  गौरविण्यात आले.राज्यात ब्रम्हा, विष्णू, महेश असे विकासाचे सरकार नाना पटोले म्हणाले, सध्या राज्यात ब्रम्हा, विष्णू व महेश असे विकासाचे सरकार आहे. या सरकारने प्रथम शेतक-यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असून जनतेची कामे सरकारकडून करुन घेणार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातSangamnerसंगमनेर