शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बियाणांचा बोगसपणा सिद्ध न झाल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा, ग्राहक मंचात ३६ टक्केच तक्रारी निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:51 IST

सुदाम देशमुख अहमदनगर : पेरलेले बियाणे बोगस आहेत, हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करू न शकल्याने शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ...

सुदाम देशमुखअहमदनगर : पेरलेले बियाणे बोगस आहेत, हे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करू न शकल्याने शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात बियाणांबाबतच्या केवळ ३६ टक्केच तक्रारी निघाल्याचे दिसते आहे.बोगस बियाणे दिली म्हणून शेतकºयांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र बहुतांश प्रकरणात शेतकरी व बियाणे उत्पादक कंपन्या यांच्यामध्ये  तडजोडी झाल्याचे निकालावरून दिसून येते. सर्वच कंपन्यांची कार्यालये जिल्ह्याबाहेर असल्याने त्यांच्या प्रतिनिधींची अनुपस्थिती असल्याने सुनावणीमध्येही अडचणी येत आहेत. ग्राहक मंचाच्या संकेतस्थळावर तीन वर्षात १९ तक्रारी दाखल असून त्यामध्ये केवळ  सातच तक्रारी निकालात निघाल्याचे दिसून आले आहे. 

शेतकरी नामांकित कंपन्यांकडून बियाणे घेतात. मात्र ते बियाणे शेतात उगवले नाही तर शेतकºयांचे आर्थिक नुकसान होते. यामुळे शेतकरी अनेकवेळा कर्जबाजारीही होतात. काही शेतकरी कंपनीविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल करतात. मात्र बियाणे बोगस असल्याचे पुरावे काय द्यायचे, असा प्रश्न शेतकºयांना पडतो. जे बियाणे विकत घेतलेले असते ते बियाणे सर्व पेरलेले असते. केवळ संबंधित कंपनीकडून बियाणे घेतल्याची पावतीही युक्तीवाद करताना अपुरी पडते. बियाणे सकस व दर्जेदार असल्याचे पुरावे कंपनीकडून केले जातात. यामध्ये शेतकºयांना दोन पावले मागेच सरकावे लागते. बहुतांश तक्रारींमध्ये कंपनी बियाणे देण्याचे कबूल करते. त्यामुळे तक्रारदार शेतकरी व कंपनी यांच्यामध्ये तडजोड होते. त्यामुळे तक्रारी फाईलबंद होतात. 

कंपनीचा वकील अनेकवेळा वेळेवर उपस्थित राहत नाही. त्यामुळे तारखा लांबणीवर पडतात. परिणामी अनेक शेतकºयांच्या तक्रारी निकालात निघण्याचे प्रमाण केवळ ३६ टक्केच असल्याचे दिसून येते.अशी फेटाळली जाते तक्रार

अनेक तक्रारी निकालात निघतात, मात्र त्यात शेतकºयाला नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी निराश होतात. एका तक्रारीत बियाणे बोगस असल्याचे कुठेही सिद्ध झाले नाही. त्यातील युक्तीवाद असा. तक्रारदारास दिलेले मूग बियाणे हे उत्पादकीय दूषित आहेत असे कुठेही म्हटलेले नाही. कंपनीने तक्रारदारास ज्या गुणवत्तेची बियाणे दिलेली आहेत त्याच गुणवत्तेचे मुगाचे पीक आलेले आहे. म्हणजेच बियाणाच्या गुुणवत्तेबद्दल तक्रार नाही. बियाणाची उगवण अतिशय चांगल्या प्रकारे झालेली होती. फुलधारणा व्यवस्थित  झालेली होती. त्यास शेंगाही व्यवस्थित आलेल्या होत्या. वास्तविक मूग पिकास फुलधारणा होणे, शेंगा येणे, शेंगा बारीक, आखुड, मोठ्या असणे, शेंगा कमी जास्त प्रमाणात लागणे हे पूर्णपणे हवामान, तापमान, वातावरणातील बदल, जमिनीचा पोत, खते, औषधे, पाण्याचा नियमितपणा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते. तक्रारदाराने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीस हाताशी धरुन खोट्या मजकुराचा अहवाल तयार करुन त्याआधारे खोट्या मजकुराचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदाराचे मूग पिकाचे ६० टक्के किंवा त्यावर नुकसान झालेले नाही. सदरची तक्रार ही खर्चासह रद्द करण्यात यावी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी