शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

अतिक्रमणांचा फास

By admin | Updated: May 22, 2014 00:01 IST

संगमनेर : भारतातील एकाच राज्यातील शहरांना जोडणार्‍या एकमेव नाशिक-पुणे राष्टÑीय महामार्गाला तब्बल ३०५ अतिक्रमणांचा विळखा बसला आहे.

संगमनेर : भारतातील एकाच राज्यातील शहरांना जोडणार्‍या एकमेव नाशिक-पुणे राष्टÑीय महामार्गाला तब्बल ३०५ अतिक्रमणांचा विळखा बसला आहे. आत्तापर्यंत चार वेळा अतिक्रमणे हटविण्याचा बागूलबुवा उभा करण्यात आला. मात्र प्रशासनाच्या कारवाई शुन्यतेमुळे महामार्ग धोक्याची घंटा ठरला आहे. नाशिक व पुणे या महानगरांना जोडणारा महामार्ग शहरातून जातो. महामार्गावर दुतर्फा अतिक्रमणे वाढल्याने रस्ता अरूंद झाला आहे. १३२ के.व्ही. ते प्रवरा पूल दरम्यान ३.४० किलोमीटर लांबीचा महामार्ग अधिकृत, अनधिकृत अतिक्रमणांनी व्यापला आहे. दुकानांपुढे कच्च्या-पक्या शेड उभ्या करून पथार्‍या पसरवून थेट रस्त्यावर व्यापार केला जातो. ग्राहकांची वाहने दुकानांसमोर लागतात. पार्र्किंगअभावी रिक्षा व इतर वाहने रस्त्यावर उभी राहतात. महामार्गावरून नाशिक, पुणे, अहमदनगरकडे वाहतूक करणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. त्यात रस्त्यावर थाटलेल्या अतिक्रमणांमुळे ७-८ फूट रस्ता उरला आहे. बाजारपेठेमुळे दैनंदिन राबता असतो. वाहनांची रेलचेल व पादचार्‍यांच्या गर्दीमुळे रहदारीत अडथळे येतात. वाहतूक तासन्तास खंडित होवून वाहनांची कोंडी होते. अवजड वाहतूकीसाठी ९ किलोमीटर लांबीच्या बायपासची निर्मिती झाली. बायपासने वाहने धावू लागली खरी. पण, शहरातील वाहतुकीची समस्या मात्र तशीच राहिली. अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी संबंधीत महामार्ग उपविभाग व नगरपालिकेची आहे. परंतु मतांच्या राजकारणासाठी अतिक्रमण हटविण्याविषयी पालिका उदासिन आहे. महामार्ग उपविभाग दरवेळी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजाविण्याचा फार्स करतो. कारवाई मात्र शून्य असते. महामार्ग उपविभागातील अधिकार्‍यांवर राजकीय दबाव, दुकानदारांशी असलेले हितसंबंध, आर्थिक तडजोडी आदी बाबींमुळे महामार्ग अतिक्रमणांनी पूर्णत: वेढला गेला आहे. लोकसंख्येसह वाहन संख्येत झपाट्याने भर पडत असल्याने महामार्गाचे रूंदीकरण होणे काळाची गरज आहे. (प्रतिनिधी)