शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अतिक्रमणांचा फास

By admin | Updated: May 22, 2014 00:01 IST

संगमनेर : भारतातील एकाच राज्यातील शहरांना जोडणार्‍या एकमेव नाशिक-पुणे राष्टÑीय महामार्गाला तब्बल ३०५ अतिक्रमणांचा विळखा बसला आहे.

संगमनेर : भारतातील एकाच राज्यातील शहरांना जोडणार्‍या एकमेव नाशिक-पुणे राष्टÑीय महामार्गाला तब्बल ३०५ अतिक्रमणांचा विळखा बसला आहे. आत्तापर्यंत चार वेळा अतिक्रमणे हटविण्याचा बागूलबुवा उभा करण्यात आला. मात्र प्रशासनाच्या कारवाई शुन्यतेमुळे महामार्ग धोक्याची घंटा ठरला आहे. नाशिक व पुणे या महानगरांना जोडणारा महामार्ग शहरातून जातो. महामार्गावर दुतर्फा अतिक्रमणे वाढल्याने रस्ता अरूंद झाला आहे. १३२ के.व्ही. ते प्रवरा पूल दरम्यान ३.४० किलोमीटर लांबीचा महामार्ग अधिकृत, अनधिकृत अतिक्रमणांनी व्यापला आहे. दुकानांपुढे कच्च्या-पक्या शेड उभ्या करून पथार्‍या पसरवून थेट रस्त्यावर व्यापार केला जातो. ग्राहकांची वाहने दुकानांसमोर लागतात. पार्र्किंगअभावी रिक्षा व इतर वाहने रस्त्यावर उभी राहतात. महामार्गावरून नाशिक, पुणे, अहमदनगरकडे वाहतूक करणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. त्यात रस्त्यावर थाटलेल्या अतिक्रमणांमुळे ७-८ फूट रस्ता उरला आहे. बाजारपेठेमुळे दैनंदिन राबता असतो. वाहनांची रेलचेल व पादचार्‍यांच्या गर्दीमुळे रहदारीत अडथळे येतात. वाहतूक तासन्तास खंडित होवून वाहनांची कोंडी होते. अवजड वाहतूकीसाठी ९ किलोमीटर लांबीच्या बायपासची निर्मिती झाली. बायपासने वाहने धावू लागली खरी. पण, शहरातील वाहतुकीची समस्या मात्र तशीच राहिली. अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी संबंधीत महामार्ग उपविभाग व नगरपालिकेची आहे. परंतु मतांच्या राजकारणासाठी अतिक्रमण हटविण्याविषयी पालिका उदासिन आहे. महामार्ग उपविभाग दरवेळी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजाविण्याचा फार्स करतो. कारवाई मात्र शून्य असते. महामार्ग उपविभागातील अधिकार्‍यांवर राजकीय दबाव, दुकानदारांशी असलेले हितसंबंध, आर्थिक तडजोडी आदी बाबींमुळे महामार्ग अतिक्रमणांनी पूर्णत: वेढला गेला आहे. लोकसंख्येसह वाहन संख्येत झपाट्याने भर पडत असल्याने महामार्गाचे रूंदीकरण होणे काळाची गरज आहे. (प्रतिनिधी)