शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई योजनांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: August 2, 2014 01:01 IST

अहमदनगर: जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद न करता सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

अहमदनगर: जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद न करता सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ टंचाईच्या विविध योजनांना येत्या ३१आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, टँकर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़महसूल दिनानिमित विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते़ त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली़ पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला़ यासह विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत़ सुरुवातीला ३० जुलैपर्यंत याविषयीच्या विविध योजनांना मुदतवाढ दिली होती़ जुलैमध्ये पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती़ मात्र जुलै महिन्यांत पावसाची सरासरी वाढली नाही़ त्यामुळे शासनाने टंचाईबाबतच्या विविध योजनांना येत्या ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार उपाययोजना सुरू ठेवल्या जातील़ योजनांचा फेर आढावा घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यात कुठे टँकरची आवश्यकता आहे आणि कुठे नाही, याविषयीचा अहवाल मागविण्यात आला आहे़ अहवाल प्राप्त झाल्यानंतर टँकरबाबत निर्णय घेतला जाईल़ मात्र जिथे गरज आहे, तिथे टँकर दिले जातील, असे कवडे यावेळी म्हणाले़जिल्ह्यात आतापर्यंत २३ टक्के इतकाच पाऊस झाला आहे़ पुरेसा पाऊस पडला नाही़ सुदैवाने मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला़ त्यामुळे दोन्ही धरणांत नवीन पाण्याची आवक सुरू झाली़ मुळा ४६ तर भंडारदरा धरण ६२ टक्के इतके भरले आहे़ त्यात आता पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही ओसरला आहे़ त्यामुळे आवक मंदावली असून, आणखी पाऊस होण्याची गरज आहे़ शासनाच्या वतीने पाणीटंचाई असलेल्या गावात ज्या उपाय योजना सुरू आहेत, त्या सुरूच राहतील़ त्यात खंड पडणार नाही, असे ते म्हणाले़ (प्रतिनिधी) २८१ गावांत टंचाई कायमजिल्ह्यातील २८१ गावे आणि १ हजार ३०१ वाड्या-वस्त्यांना ३४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरीदेखील टँकरची संख्या कायम आहे़त्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेशमाळीण येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़ आपत्ती व्यवस्थापन कक्षातील यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, जिल्ह्यात धोकादायक असलेल्या परिसराची पाहणी करून अहवाल मागविण्यात आले आहेत, असे कवडे यांनी यावेळी सांगितले़