शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अहमदनगर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये खळबळ

By अण्णा नवथर | Updated: April 16, 2024 13:56 IST

Maharashtra Lok sabha Election 2024: अहमदनगर मतदारसंघात भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अहमदनगरची जागा भाजप गमावणार आहे असा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन राजीनामे दिले.

- अण्णा नवथर अहमदनगर - अहमदनगर मतदारसंघात भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अहमदनगरची जागा भाजप गमावणार आहे असा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन राजीनामे दिले. त्यामुळे नगर जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खुलासा करण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अहमदनगर शहरात पत्रकार परिषद घेतली. मात्र तेही उत्तरे देताना गोंधळून गेल्याचे दिसले.

भाजपचे शेवगाव तालुक्यातील पदाधिकारी सुनील रासने यांनी मुंबईत जाऊन राजीनामा दिला. खासदार विखे हे कोणाचेही फोन उचलत नाहीत. त्यांच्याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी घालवण्यासाठी त्यांनी डाळ साखर वाटण्याचा प्रयत्न केला. भाजप देशात 400 जागा जिंकेलही मात्र नगरची जागा पक्ष गमावणार आहे. याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना चिंता वाटते. त्यामुळेच विखे यांना उमेदवारी देऊ नये अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र पक्षाने त्याची दखल घेतली नाही. अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे आम्ही पदांचे राजीनामे देत आहोत. पक्षाचे सदस्य म्हणून कार्यरत राहू, असे रासने यांनी सांगितले. अनेक पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात सविस्तर भूमिका विशद करून तसे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिले आहे.

दरम्यान, या राजीनाम्याबाबत भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी अहमदनगर येथे  मंगळवारी पत्रकार परिषद घेत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही याबाबत काही सांगता आले नाही. 'राजीनामा हे पत्र काय आहे,  हे आम्हीच अजून पाहिलेले नाही. या पत्राची शहानिशा करून खुलासा करू ' असे ते म्हणाले. तसेच या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशचे प्रदेश सचिव अरुण मुंडे हेही उपस्थित होते. ते शेवगाव तालुक्यातील आहेत. त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनाही सविस्तर माहिती देता आली नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारताच मुंडे फोन आल्याचे कारण सांगून पत्रकार परिषदेतून निघून गेले. दरम्यान, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, शेवगाव पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल. याबाबत आपण बोलणे उचित होणार नाही

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाAhmednagarअहमदनगर