शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सुजय विखेंचं नाव संग्राम जगतापांच्या वर; पाहा कसा ठरतो EVM वरचा क्रम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 17:36 IST

‘नावात काय आहे?’ असं जगविख्यात लेखक शेक्सपिअरने म्हटलेलं आहे. खरंच नावात काय असतं आणि त्याचे महत्त्व कधी, कुठे अधोरेखित होईल, याची अनुभूती सध्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना येत आहे.

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : ‘नावात काय आहे?’ असं जगविख्यात लेखक शेक्सपिअरने म्हटलेलं आहे. खरंच नावात काय असतं आणि त्याचे महत्त्व कधी, कुठे अधोरेखित होईल, याची अनुभूती सध्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना येत आहे.

सोमवारी अहमदनगर मतदारसंघ निवडणूक रिंगणातील उमेदवार अंतिम झाले आणि मतदानावेळी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर असणारा उमेदवारांचा क्रम समोर आला. त्यात बसपाचे नामदेव वाकळे प्रथम, भाजपचे सुजय विखे दुसऱ्या तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर राज्यस्तरीय पक्ष व शेवटी अपक्ष असा हा क्रम पुढे जातो. मुळात मतदान यंत्रावरील उमेदवारांचा क्रम ठरतो कसा, त्यात सर्वांत वर कोण, सर्वात खाली कोण अशी चर्चा सुरू झाली. निवडणूक शाखेकडे विचारणा केली असता, त्यांनी या नावांच्या क्रमाचे सूत्र ‘लोकमत’शी बोलताना विशद केले.केंद्रीय निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी २००९ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदान यंत्रावरील उमेदवारांच्या नावाचा क्रम ठरविला गेलेला आहे.या प्रक्रियेत प्रथम पक्षांचा क्रम ठरवला जातो, त्यानंतर उमेदवारांच्या नावांचा विचार होतो. प्रथम मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर नोंदणी झालेला, मात्र मान्यता नसलेला पक्ष व शेवटी अपक्ष अशी ही यादी झाल्यानंतर मग उमेदवारांची नावे अल्फाबेटप्रमाणे घेतली जातात.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्या त्या राज्याची राजभाषा निवडणुकीचे माध्यम म्हणून वापरतात. महाराष्ट्रात सर्व मतदारसंघांत निवडणुकीचे कामकाज मराठीतच चालते. त्यामुळे ईव्हीएमवर उमेदवारांची नावेही मराठी वर्णमालेनुसार ठरवून हा क्रम अंतिम केला जातो.‘सु’.... नंतर ‘सं....’भाजपचे सुजय विखे व राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यातील अहमदनगर मतदारसंघाची लढत देशात लक्षवेधी ठरली आहे. दोन तुल्यबळ उमेदवारांत होणारी ही निवडणूक आपापल्या पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे संग्राम-सुजय यांच्यात कोण बाजी मारणार? अशा पैजाच मतदारांत सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मतदान यंत्रावर उमेदवारांच्या नावांचा क्रम लक्षात घेता येथे सुजय व संग्राम यापैकी कोणाचे नाव अगोदर येणार हा प्रश्न होता. या मतदारसंघात बसपा, भाजप व राष्ट्रवादी हे तीन राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांच्या उमेदवारांना वरची पसंती देण्यात आली आहे. यातही मराठी वर्णमालेनुसार बसपाचे नामदेव वाकळे प्रथम आहेत. त्यानंतर सुजय व संग्राम यांची नावे आहेत. दोघांचे ‘स’ हे वर्ण समान येतात. परंतु वर्णमालेनुसार उकार हा अनुस्वाराच्या आधी येतो. त्यामुळे ईव्हीएमवर ‘सु’जय हे नाव ‘सं’ग्राम यांच्या आधी आलेले आहे.

टॅग्स :ahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Votingमतदान