शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीतून जनतेची आर्थिक नसबंदी; राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 17:43 IST

मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटाबंदी केली. मात्र प्रत्यक्षात किती काळा पैसा बाहेर काढला. उलट मुठभर लोकांच्या काळ्या धनाचे पांढरे धन केले.

श्रीगोंदा : मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटाबंदी केली. मात्र प्रत्यक्षात किती काळा पैसा बाहेर काढला. उलट मुठभर लोकांच्या काळ्या धनाचे पांढरे धन केले. नोटाबंदीमुळे मात्र सामान्य नागरिकांची आर्थिक नसबंदी झाली, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी सेवा संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे होते. विखे म्हणाले, शासनाने शेतक-यांना ऐतिहासिक कर्जमाफीचे आमिष दाखवले, परंतु शेतक-यांना कर्जमाफीची खोटी प्रमाणपत्रे देऊन ऐतिहासिक फसवणूक केली. आता या सरकारला जनता ऐतिहासिक चपराक देणार आहे. आघाडीचे सरकार असताना नगर जिल्ह्यातील शेतक-यांना १ हजार १०० कोटीचे अनुदान देण्यात आले. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांना दुष्काळात २७ कोटी ठिंबकसाठी, ५ कोटी पीक विम्यापोटी, शेततळ्यासाठी ७ कोटीचे अनुदान दिले.शिवाजीराव नागवडे म्हणाले, शासनाने वारेमाप करवाढ केली आहे. हे शासन सहकाराच्या तर हात धुवून मागे लागले आहे. या नादान सरकारचा समाचार घ्यावा लागणार आहे. अण्णासाहेब शेलार म्हणाले, भाजपाचे माझ्या मागे लागले. त्यांचा मुकाबला करण्यासाठी राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्यातील नेत्यांनी पुन्हा मूठ बांधण्याची गरज आहे.भगवानराव पाचपुते, तुकाराम दरेकर, दिनेश इथापे, सरस्वती डाके यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, जि.प.च्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, विश्वास थोरात, हरिदास शिर्के, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब गिरमकर, प्रशांत दरेकर, अमृत पितळे, धना पाटील, संजय जामदार, अर्चना गोरे उपस्थित होते.

भाषणे ऐकून अंगावर काटा

श्रीगोंद्यात भाषणे करणारांची संख्या वाढली आहे. ही भाषणे ऐकून अंगावर काटा येतो. तुम्ही भाषणे कमी करा. आपण अण्णासाहेब शेलार यांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. आम्ही शेलार यांना ताकद देणार आहे. कामाचा वेग वाढवा, भविष्यकाळ तुमचाच राहणार आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.(फोटो-०९ श्रीगोंदा, विखे)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNote BanनोटाबंदीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार