शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

‘साकळाई’साठी सोमवारपासून मुंबईत धरणे : बैठकीत शेतकऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:32 IST

श्रीगोंदा व नगर तालुक्यांतील तब्बल ३५ गावांच्या पाण्याबाबत आस्थेचा विषय असलेल्या साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईत आझाद मैदानात सोमवारपासून (दि.२४) धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.

श्रीगोंदा/केडगाव : श्रीगोंदा व नगर तालुक्यांतील तब्बल ३५ गावांच्या पाण्याबाबत आस्थेचा विषय असलेल्या साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईत आझाद मैदानात सोमवारपासून (दि.२४) धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणमधील बोरूडे मळा येथील मारूती मंदिरात शेतकऱ्यांची बैठक झाली.आश्वासने देऊनही पुढे काहीच कारवाई होत नसल्याने मुंबई येथे अधिवेशनाच्या दरम्यान येत्या २४ जून रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने योजनेची अधिसुचना काढली नाही तर ९ आॅगस्टपासून बेमुदत उपोषणाचे निवेदन धरणे आंदोलनाच्या दिवशी शासनाला देण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी विक्रम शेळके, धनंजय शिंदे, शिवाजी वाघमारे, शिवा म्हस्के, युवराज पडोळकर, हर्षवर्धन शेळके, जयसिंग खेंडके, दादासाहेब जगताप, महेश शिंदे, गोवर्धन कार्ले, राजेंद्र लोखंडे, कारभारी बोरूडे, शिवाजी शेलार, बापूराव ढवळे, डॉ. बापू नलगे, अक्षय धोंडे, संतोष लाटे, राजेंद्र बोरूडे, यशवंत लोखंडे, दिलीप शेळके, नवनाथ पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावे आणि नगर तालुक्यातील हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, वाळकी, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुई, गुंडेगाव, वडगाव, तांदळी, देऊळगाव, गुणवडी, राळेगण, अंबीलवाडी आदी १७ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सन १९९८ पासून साकळाई योजनेचा विषय चर्चेत आला आहे. तेव्हा युती सरकारच्या काळात या योजनेला तात्विक मंजुरी मिळाली. अनेकांनी याच योजनेच्या मुद्यावर विधानसभा निवडणुका लढवल्या. केवळ निवडणुकांपुरताच हा विषय चर्चेत राहिला. योजनेला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळालीच नाही.काही महिन्यापूर्वी शेतकºयांनी राजकारण विरहीत समिती तयार करून पुन्हा या योजनेबाबत जनजागृती सुरू केली. त्यास सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळाला. अभिनेत्री दिपाली सय्यद, खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले व आमदार राहुल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांची वेगवेगळी भेट घेऊन लक्ष वेधले. या योजनेमुळे दुष्काळी गावांचा चेहरामोहरा बदलेल. या योजनेमुळे जवळपास १२० पाझर तलाव आणि १०० कोल्हापुरी बंधारे भरले जातील. त्यामुळे १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बागायती होणार आहे. यासाठी जवळपास ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.काय आहे साकळाई योजना..कुकडी प्रकल्पाचे पावसाळ्यात वाया जाणारे अतिरिक्त पाणी विसापूर धरणातून बंद पाईपने उचलून ११ कि. मी. अंतरावरील साकळाई डोंगरावर नेण्यात येणार आहे. दोन मोठे डिलीव्हरी चेंबर उभारून त्यामधून पुन्हा बंद पाईपलाईनमधून नैसर्गिक उताराने हे पाणी नगर तालुक्याच्या बाजूला ११ कि. मी.च्या अंतरावरील सुमारे १७ गावांना आणि श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावांना पोहचविले जाणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखे