शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘साकळाई’साठी सोमवारपासून मुंबईत धरणे : बैठकीत शेतकऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:32 IST

श्रीगोंदा व नगर तालुक्यांतील तब्बल ३५ गावांच्या पाण्याबाबत आस्थेचा विषय असलेल्या साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईत आझाद मैदानात सोमवारपासून (दि.२४) धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.

श्रीगोंदा/केडगाव : श्रीगोंदा व नगर तालुक्यांतील तब्बल ३५ गावांच्या पाण्याबाबत आस्थेचा विषय असलेल्या साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईत आझाद मैदानात सोमवारपासून (दि.२४) धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणमधील बोरूडे मळा येथील मारूती मंदिरात शेतकऱ्यांची बैठक झाली.आश्वासने देऊनही पुढे काहीच कारवाई होत नसल्याने मुंबई येथे अधिवेशनाच्या दरम्यान येत्या २४ जून रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने योजनेची अधिसुचना काढली नाही तर ९ आॅगस्टपासून बेमुदत उपोषणाचे निवेदन धरणे आंदोलनाच्या दिवशी शासनाला देण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी विक्रम शेळके, धनंजय शिंदे, शिवाजी वाघमारे, शिवा म्हस्के, युवराज पडोळकर, हर्षवर्धन शेळके, जयसिंग खेंडके, दादासाहेब जगताप, महेश शिंदे, गोवर्धन कार्ले, राजेंद्र लोखंडे, कारभारी बोरूडे, शिवाजी शेलार, बापूराव ढवळे, डॉ. बापू नलगे, अक्षय धोंडे, संतोष लाटे, राजेंद्र बोरूडे, यशवंत लोखंडे, दिलीप शेळके, नवनाथ पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावे आणि नगर तालुक्यातील हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, वाळकी, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुई, गुंडेगाव, वडगाव, तांदळी, देऊळगाव, गुणवडी, राळेगण, अंबीलवाडी आदी १७ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सन १९९८ पासून साकळाई योजनेचा विषय चर्चेत आला आहे. तेव्हा युती सरकारच्या काळात या योजनेला तात्विक मंजुरी मिळाली. अनेकांनी याच योजनेच्या मुद्यावर विधानसभा निवडणुका लढवल्या. केवळ निवडणुकांपुरताच हा विषय चर्चेत राहिला. योजनेला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळालीच नाही.काही महिन्यापूर्वी शेतकºयांनी राजकारण विरहीत समिती तयार करून पुन्हा या योजनेबाबत जनजागृती सुरू केली. त्यास सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळाला. अभिनेत्री दिपाली सय्यद, खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले व आमदार राहुल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांची वेगवेगळी भेट घेऊन लक्ष वेधले. या योजनेमुळे दुष्काळी गावांचा चेहरामोहरा बदलेल. या योजनेमुळे जवळपास १२० पाझर तलाव आणि १०० कोल्हापुरी बंधारे भरले जातील. त्यामुळे १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बागायती होणार आहे. यासाठी जवळपास ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.काय आहे साकळाई योजना..कुकडी प्रकल्पाचे पावसाळ्यात वाया जाणारे अतिरिक्त पाणी विसापूर धरणातून बंद पाईपने उचलून ११ कि. मी. अंतरावरील साकळाई डोंगरावर नेण्यात येणार आहे. दोन मोठे डिलीव्हरी चेंबर उभारून त्यामधून पुन्हा बंद पाईपलाईनमधून नैसर्गिक उताराने हे पाणी नगर तालुक्याच्या बाजूला ११ कि. मी.च्या अंतरावरील सुमारे १७ गावांना आणि श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावांना पोहचविले जाणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखे