शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

एकाकीपणामुळे तरुणांना मोबाईलवर पब्जीचे वेड : राजरत्न खिल्लारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:31 IST

पब्जी गेमच्या आहारी जाऊन श्रीरामपूरमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने डोक्यात गोळ््या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.

भरत मोहोळकरअहमदनगर : पब्जी गेमच्या आहारी जाऊन श्रीरामपूरमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने डोक्यात गोळ््या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. पब्जीच्या आहारी जाऊन आत्महत्या करणारा जिल्ह्यातील तो दुसरा बळी ठरला आहे. तर अनेक मुले पब्जीच्या वेड्यापायी आई-वडिलांपासून दुरावत आहेत. या गेमच्या आहारी जाण्यापासून तरुणांना कसे परावृत्त करता येईल, याबाबत न्यू आर्टस् महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील समुपदेशक प्रा. राजरत्न खिल्लारे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.प्रश्न : पब्जी या गेमचे व्यसन नेमके कसे लागते?उत्तर : नात्यात विसंवाद निर्माण झाल्यानंतर तो एकाकीपणा घालवण्यासाठी मुले हा गेम खेळायला सुरूवात करतात. या गेमध्ये अनेक टप्पे आहेत. त्यात प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी तरूण प्रयत्न करतात. मग जर एखाद्या टप्प्यावर अपयश आले तर तो टप्पा पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा प्रयत्न करतात. या यशापयशाच्या खेळात त्यांच्या पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याने या गेमचे सवयीत व सवयींचे रूपांतर व्यसनात होते.प्रश्न : या गेमचा तरूणांवर काय परिणाम होतो?उत्तर : या गेममुळे तरूणांचा वेळ वाया जातो. तसेच या गेमचा तरूणांच्या मनावर भयंकर परिणाम होतो. यामध्ये पब्जीचे टप्पे पार झाले नाहीत तर मनावर ताण येतो.यामुळे नैराश्यता येते. त्यामुळे ते आणखी जास्त वेळ गेम खेळतात. त्यामुळे डोळे व डोके दुखण्याची शक्यता असते. या गेमची सवय लागली तर झोप व जेवणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मुलांचा स्वभाव चिडचिडा होतो. या सगळ्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.प्रश्न : या विळख्यातून सोडवण्यासाठी काही ठोस उपाय?उत्तर : तरूण या व्यसनात किती अडकला आहे ते तपासून त्याच्या समुपदेशनातून त्याला विळख्यातून बाहेर काढता येईल. पालकांनीही मुलांसोबत सुसंवाद ठेवावा. तरूणांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल सकारात्मक भावना जागवावी. गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे, यांसारख्या विशिष्ट कामात मन गुंतवले तर हे व्यसन सोडवायला मदत होईल.प्रश्न : पब्जी गेमकडे तरूण का वळतो आहे?उत्तर : कुटुंबात निर्माण होणारा विसंवाद, तरूण तरूणींमधील ब्रेकअपचे वाढते प्रमाण, त्यातून निर्माण होणारा एकाकीपणा, त्यातून येणारे नैराश्य यामुळे तरुण पब्जीसारख्या गेमकडे वळला आहे. आर्थिक चणचण हे एक कारण आहे.तरुणांचा पालकांशी विसंवाद आहे. बेरोजगारी, अपयश आणि कमी पैशात नेट पॅक ही पब्जीकडे ओढली जाण्याची कारणे आहेत. -राजरत्न खिल्लारे

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर