शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

एकाकीपणामुळे तरुणांना मोबाईलवर पब्जीचे वेड : राजरत्न खिल्लारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:31 IST

पब्जी गेमच्या आहारी जाऊन श्रीरामपूरमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने डोक्यात गोळ््या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.

भरत मोहोळकरअहमदनगर : पब्जी गेमच्या आहारी जाऊन श्रीरामपूरमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने डोक्यात गोळ््या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. पब्जीच्या आहारी जाऊन आत्महत्या करणारा जिल्ह्यातील तो दुसरा बळी ठरला आहे. तर अनेक मुले पब्जीच्या वेड्यापायी आई-वडिलांपासून दुरावत आहेत. या गेमच्या आहारी जाण्यापासून तरुणांना कसे परावृत्त करता येईल, याबाबत न्यू आर्टस् महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील समुपदेशक प्रा. राजरत्न खिल्लारे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.प्रश्न : पब्जी या गेमचे व्यसन नेमके कसे लागते?उत्तर : नात्यात विसंवाद निर्माण झाल्यानंतर तो एकाकीपणा घालवण्यासाठी मुले हा गेम खेळायला सुरूवात करतात. या गेमध्ये अनेक टप्पे आहेत. त्यात प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी तरूण प्रयत्न करतात. मग जर एखाद्या टप्प्यावर अपयश आले तर तो टप्पा पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा प्रयत्न करतात. या यशापयशाच्या खेळात त्यांच्या पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याने या गेमचे सवयीत व सवयींचे रूपांतर व्यसनात होते.प्रश्न : या गेमचा तरूणांवर काय परिणाम होतो?उत्तर : या गेममुळे तरूणांचा वेळ वाया जातो. तसेच या गेमचा तरूणांच्या मनावर भयंकर परिणाम होतो. यामध्ये पब्जीचे टप्पे पार झाले नाहीत तर मनावर ताण येतो.यामुळे नैराश्यता येते. त्यामुळे ते आणखी जास्त वेळ गेम खेळतात. त्यामुळे डोळे व डोके दुखण्याची शक्यता असते. या गेमची सवय लागली तर झोप व जेवणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मुलांचा स्वभाव चिडचिडा होतो. या सगळ्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.प्रश्न : या विळख्यातून सोडवण्यासाठी काही ठोस उपाय?उत्तर : तरूण या व्यसनात किती अडकला आहे ते तपासून त्याच्या समुपदेशनातून त्याला विळख्यातून बाहेर काढता येईल. पालकांनीही मुलांसोबत सुसंवाद ठेवावा. तरूणांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल सकारात्मक भावना जागवावी. गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे, यांसारख्या विशिष्ट कामात मन गुंतवले तर हे व्यसन सोडवायला मदत होईल.प्रश्न : पब्जी गेमकडे तरूण का वळतो आहे?उत्तर : कुटुंबात निर्माण होणारा विसंवाद, तरूण तरूणींमधील ब्रेकअपचे वाढते प्रमाण, त्यातून निर्माण होणारा एकाकीपणा, त्यातून येणारे नैराश्य यामुळे तरुण पब्जीसारख्या गेमकडे वळला आहे. आर्थिक चणचण हे एक कारण आहे.तरुणांचा पालकांशी विसंवाद आहे. बेरोजगारी, अपयश आणि कमी पैशात नेट पॅक ही पब्जीकडे ओढली जाण्याची कारणे आहेत. -राजरत्न खिल्लारे

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर