शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
5
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
6
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
7
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
8
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
9
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
10
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
11
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
12
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
14
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
15
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
16
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
17
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
18
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
19
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
20
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
Daily Top 2Weekly Top 5

एकाकीपणामुळे तरुणांना मोबाईलवर पब्जीचे वेड : राजरत्न खिल्लारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:31 IST

पब्जी गेमच्या आहारी जाऊन श्रीरामपूरमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने डोक्यात गोळ््या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.

भरत मोहोळकरअहमदनगर : पब्जी गेमच्या आहारी जाऊन श्रीरामपूरमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने डोक्यात गोळ््या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. पब्जीच्या आहारी जाऊन आत्महत्या करणारा जिल्ह्यातील तो दुसरा बळी ठरला आहे. तर अनेक मुले पब्जीच्या वेड्यापायी आई-वडिलांपासून दुरावत आहेत. या गेमच्या आहारी जाण्यापासून तरुणांना कसे परावृत्त करता येईल, याबाबत न्यू आर्टस् महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील समुपदेशक प्रा. राजरत्न खिल्लारे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.प्रश्न : पब्जी या गेमचे व्यसन नेमके कसे लागते?उत्तर : नात्यात विसंवाद निर्माण झाल्यानंतर तो एकाकीपणा घालवण्यासाठी मुले हा गेम खेळायला सुरूवात करतात. या गेमध्ये अनेक टप्पे आहेत. त्यात प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी तरूण प्रयत्न करतात. मग जर एखाद्या टप्प्यावर अपयश आले तर तो टप्पा पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा प्रयत्न करतात. या यशापयशाच्या खेळात त्यांच्या पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याने या गेमचे सवयीत व सवयींचे रूपांतर व्यसनात होते.प्रश्न : या गेमचा तरूणांवर काय परिणाम होतो?उत्तर : या गेममुळे तरूणांचा वेळ वाया जातो. तसेच या गेमचा तरूणांच्या मनावर भयंकर परिणाम होतो. यामध्ये पब्जीचे टप्पे पार झाले नाहीत तर मनावर ताण येतो.यामुळे नैराश्यता येते. त्यामुळे ते आणखी जास्त वेळ गेम खेळतात. त्यामुळे डोळे व डोके दुखण्याची शक्यता असते. या गेमची सवय लागली तर झोप व जेवणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मुलांचा स्वभाव चिडचिडा होतो. या सगळ्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.प्रश्न : या विळख्यातून सोडवण्यासाठी काही ठोस उपाय?उत्तर : तरूण या व्यसनात किती अडकला आहे ते तपासून त्याच्या समुपदेशनातून त्याला विळख्यातून बाहेर काढता येईल. पालकांनीही मुलांसोबत सुसंवाद ठेवावा. तरूणांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल सकारात्मक भावना जागवावी. गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे, यांसारख्या विशिष्ट कामात मन गुंतवले तर हे व्यसन सोडवायला मदत होईल.प्रश्न : पब्जी गेमकडे तरूण का वळतो आहे?उत्तर : कुटुंबात निर्माण होणारा विसंवाद, तरूण तरूणींमधील ब्रेकअपचे वाढते प्रमाण, त्यातून निर्माण होणारा एकाकीपणा, त्यातून येणारे नैराश्य यामुळे तरुण पब्जीसारख्या गेमकडे वळला आहे. आर्थिक चणचण हे एक कारण आहे.तरुणांचा पालकांशी विसंवाद आहे. बेरोजगारी, अपयश आणि कमी पैशात नेट पॅक ही पब्जीकडे ओढली जाण्याची कारणे आहेत. -राजरत्न खिल्लारे

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर