शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मत्स्य व्यावसायिकांना दुष्काळाचा फटका

By admin | Updated: March 17, 2016 23:39 IST

अहमदनगर : दुष्काळामुळे तलाव कोरडेपडले आहेत़ तलावात पाणी न राहिल्याने मत्स्य व्यवसायावर गदा आली आहे़ त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़

अहमदनगर : दुष्काळामुळे तलाव कोरडेपडले आहेत़ तलावात पाणी न राहिल्याने मत्स्य व्यवसायावर गदा आली आहे़ त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़ जिल्ह्यात मत्स्य व्यावसायिकांचे मोठे जाळे आहे़ मत्स्य व्यावसायिकांच्या ७८ सहकारी संस्था स्थापन झाल्या आहेत़ या संस्थांमार्फत तलावातील मासेमारीचा व्यवसाय चालतो़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून शेतीप्रमाणेच हा व्यवसायही अडचणीत आला आहे़ पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील ६८ तलावांत मत्स्य व्यवसाय करण्याचे हक्क मत्स्य विभागास दिले आहेत़ त्यापैकी २४ तलावांत पाणी आले नाही़ त्यामुळे या तलावांची विक्री झाली नाही़ सहकारी संस्थांनीही त्यासाठी निविदा दाखल केल्या नाहीत़ मत्स्य व्यवसाय सुरू असलेल्या ४४ पैकी २० तलाव देखील चालू महिन्यांत कोरडे पडले आहेत़ त्यामुळे तेथील व्यवसायही बंद झाला असून, अवघ्या २४ तलावांत मत्स्य व्यवसाय सुरू आहे़ पाण्याअभावी तलाव भरले नाहीत़ त्याचा परिणाम मत्स्य व्यवसायावरदेखील झाला असून, या व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़ जिल्ह्यातील प्रमुख मुळानगर, घोड, सीना आणि खैरी या प्रमुख धरणाचे हक्कदेखील आहेत़ मुळा धरणात मत्स्य व्यवसाय सुरू आहे़ उर्वरित धरणांतील मत्स्य व्यवसायाला दुष्काळाचा फटका बसला आहे़ त्यामुळे सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या असून, त्यांच्या हाताला काम मिळाले नाही़ हा व्यवसाय करणाऱ्यांच्या हाताला काम राहिले नाही़ त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ ओढावली आहे़(प्रतिनिधी)शेततळ्यांचा पर्यायदुष्काळावर मात करण्यासाठी जिल्ह्यात दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत़ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठे शेततळे बांधण्यात येत आहेत. पावसाळ्यात त्यात पाणी साचेल, अशी अपेक्षा आहे़ त्यामुळे मध्यम तलावांबरोबरच मत्स्य व्यवसायासाठी शेततळ्यांचा पर्याय भविष्यात उपलब्ध होईल़ त्यादृष्टीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन जनजागृती केली जाणार आहे़ शेतकरीही हा व्यवसाय करू शकणार आहेत़ शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय समोर येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले़