शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

मत्स्य व्यावसायिकांना दुष्काळाचा फटका

By admin | Updated: March 17, 2016 23:39 IST

अहमदनगर : दुष्काळामुळे तलाव कोरडेपडले आहेत़ तलावात पाणी न राहिल्याने मत्स्य व्यवसायावर गदा आली आहे़ त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़

अहमदनगर : दुष्काळामुळे तलाव कोरडेपडले आहेत़ तलावात पाणी न राहिल्याने मत्स्य व्यवसायावर गदा आली आहे़ त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़ जिल्ह्यात मत्स्य व्यावसायिकांचे मोठे जाळे आहे़ मत्स्य व्यावसायिकांच्या ७८ सहकारी संस्था स्थापन झाल्या आहेत़ या संस्थांमार्फत तलावातील मासेमारीचा व्यवसाय चालतो़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून शेतीप्रमाणेच हा व्यवसायही अडचणीत आला आहे़ पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील ६८ तलावांत मत्स्य व्यवसाय करण्याचे हक्क मत्स्य विभागास दिले आहेत़ त्यापैकी २४ तलावांत पाणी आले नाही़ त्यामुळे या तलावांची विक्री झाली नाही़ सहकारी संस्थांनीही त्यासाठी निविदा दाखल केल्या नाहीत़ मत्स्य व्यवसाय सुरू असलेल्या ४४ पैकी २० तलाव देखील चालू महिन्यांत कोरडे पडले आहेत़ त्यामुळे तेथील व्यवसायही बंद झाला असून, अवघ्या २४ तलावांत मत्स्य व्यवसाय सुरू आहे़ पाण्याअभावी तलाव भरले नाहीत़ त्याचा परिणाम मत्स्य व्यवसायावरदेखील झाला असून, या व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़ जिल्ह्यातील प्रमुख मुळानगर, घोड, सीना आणि खैरी या प्रमुख धरणाचे हक्कदेखील आहेत़ मुळा धरणात मत्स्य व्यवसाय सुरू आहे़ उर्वरित धरणांतील मत्स्य व्यवसायाला दुष्काळाचा फटका बसला आहे़ त्यामुळे सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या असून, त्यांच्या हाताला काम मिळाले नाही़ हा व्यवसाय करणाऱ्यांच्या हाताला काम राहिले नाही़ त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ ओढावली आहे़(प्रतिनिधी)शेततळ्यांचा पर्यायदुष्काळावर मात करण्यासाठी जिल्ह्यात दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत़ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठे शेततळे बांधण्यात येत आहेत. पावसाळ्यात त्यात पाणी साचेल, अशी अपेक्षा आहे़ त्यामुळे मध्यम तलावांबरोबरच मत्स्य व्यवसायासाठी शेततळ्यांचा पर्याय भविष्यात उपलब्ध होईल़ त्यादृष्टीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन जनजागृती केली जाणार आहे़ शेतकरीही हा व्यवसाय करू शकणार आहेत़ शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय समोर येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले़