शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

दुष्काळात पाण्याचे फवारे

By admin | Updated: March 16, 2016 23:58 IST

अहमदनगर : दुष्काळामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे नगर शहरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे़

अहमदनगर : दुष्काळामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे नगर शहरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे़ शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागल्याने हे पाणी गटारीत वाहून जात आहे़ वाशिंग सेंटरवर तर दुचाकी व चारचाकी वाहने धुण्यासाठी वीजपंपाचा वापर करून फुकटात वारेमाप पाण्याचा उपसा सुरू आहे़ महापालिका प्रशासनाने मात्र, पाईपलाईनमधून आणि वॉशिंगसेंटरमधून निघणाऱ्या या पाण्याच्या फवाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे़ शहरात विविध भागात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली असून हे पाणी गटारीतून वाहत असल्याचे बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून निदर्शनास आले़ मुख्य रस्त्यासह अंतर्गत ठिकाणीही पाणीगळती सुरूच आहे़ या पाणीगळतीसह दुचाकी व चारचाकी वाहनांना सर्व्हिस देणाऱ्या वॉशिंग सेंटरवर मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे़ शहरासह उपनगरात २०० पेक्षा जास्त वॉशिंग सेंटर आहेत़ वाहनांच्या वॉशिंगसाठी बोअरवेल घेऊन त्या पाण्याचा उपसा केला जातो़ वीजपंप लावून वाहनांवर वेगाने पाण्याचा फवारा मारला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे़ व्यावसायिक कारणासाठी बोअरवेल घ्यावयाचा असेल तर प्रांताधिकारी व भूजल विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते़ शहरातील एकाही वॉशिंग सेंटरचालकाने अशी परवानगी घेतली नसल्याचेही समोर आले आहे़ अनेक व्यावसायिक सकाळी व सायंकाळीच्या सुमारास रस्त्यावर पाणी मारतात. यातूनही पाण्याचा मोठा अपव्यय होतो. दुष्काळामुळे पाणीपातळी खालावली असताना वाहनांना वॉशिंग करण्यासाठी होणारा पाण्याचा उपसा थांबविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) वैयक्तिक व किंवा व्यावसायिक करणासाठी ६० फूटपेक्षा जास्त बोअरवेल घ्यावयाचा असेल तर प्रांताधिकारी यांच्यामार्फत भूजल विभागाची परवानगी घेणे गरजेचे असते़ याबाबत जून २०१४ पासून कायदा झालेला आहे़ भूजलविभागाकडे मात्र, २०१४ पासून बोअरवेलसाठी कुणीही परवानगी मागीतलेली नाही़ या संदर्भात काय कारवाई करावयाची याची नियमावली शासनाकडून अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाही़ -ऋषीराज गोस्की, वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी महापालिका हद्दीत पाईपलाईन गळती असेल तर तातडीने दुरुस्तीचे काम केले जाते़ नागरिकांची तक्रार येताच कर्मचारी दखल घेऊन काम करतात़ दुष्काळ असल्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर केला जात आहे़ नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा. -महादेव काकडे, प्रभाग अभियंता, मनपा नगर शहरात औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह परिसर, वसंत टेकडी, मनमाड रोडवरील बोल्हेगाव पूल, निंबळक बायपास, तपोवन रोड, सावेडी नाका, पत्रकार चौक, एमआयडीसी परिसर, भिंगार परिसर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागल्याने लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे़ तक्रार करूनही दुर्लक्ष : शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या पाणीगळतीची स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत़ अधिकारी मात्र, दुर्लक्ष करत असल्याने हे पाणी गटारीत वाहून जाते़ वसंत टेकडी येथील स्टेशनवरून नगर तालुक्यासाठी ११ तर शहरासाठी दररोज १० टँकरने पाणीपुरवठा केला जातो़ मुळा धरणाची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांवर पाणीकपातीचे संकट आहे़ सध्या शहरात बहुतांश ठिकाणी तीन ते चार दिवसांतून एकदाच पाणी सोडले जाते़ कल्याण रोड, सारसनगर, केडगाव व बोल्हेगाव परिसरातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ महापालिकेचे टँकरही वेळेवर येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे़ नगर शहरात ३०० पेक्षा जास्त वॉशिंग सेंटर आहे़ ६० फूट पेक्षा जास्त खोल बोअरवेल घ्यावयाचा असेल तर भूजलविभागाची परवानगी घेणे आवश्यक ठरते़ तसेच महापालिकेकडेही व्यवसायाची नोंद करावी लागते़ शहरातील एकाही वॉशिंग सेंटर चालकाने बोअरवेलची परवानगी न घेताच मोठ्या प्रमाणात पाणीउपसा करून व्यवसाय करत आहेत़