शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

दुष्काळाची स्थिती चिंताजनक

By admin | Updated: November 20, 2014 14:17 IST

जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील खरीप वाया गेले, तर दुसरीकडे ७५0 गावांवर पाणी संकट कोसळणार आहे.

जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील खरीप वाया गेले, तर दुसरीकडे ७५0 गावांवर पाणी संकट कोसळणार आहे. काही तालुक्यातील फळ पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले असून,शेतकर्‍यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

जिल्ह्यात कमी पाऊस पडला. कमी पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला. केलेला खर्चही निघाला नाही. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत १ हजार ५९९ गावे आहेत. खरिपाची पिके घेणार्‍या गावांची संख्या ५८१ तर रब्बीची १ हजार १८ गावे आहेत. रब्बीची पिके सध्या उभी आहेत. नुकत्याच झालेल्या आवकाळी पावसाने रब्बीच्या पिकांना काहिसा दिलासा मिळाला. परंतु पाण्याअभावी खरिपाची पिके वाया गेली. खरिपाच्या सुधारित आणेवारीनुसार पन्नासपैसेपेक्षा कमी आणेवारी असणार्‍या गावांची संख्या ३0५ झाली आहे. या गावातील शेतकरी पिके वाया गेल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. पीक गेले आणि पिण्याच्या पाण्यासाठीही त्यांच्यावर वणवण करण्याची वेळ येणार आहे. त्यांना आता एकमेव रब्बी पिकांची आशा आहे. या पिकांना जीवदान देण्यासाठी शक्य तिथे जलाशयातून आवर्तन सोडण्यात आले होते. परंतु अवकाळी पाऊस झाल्याने आवर्तन बंद करण्यात आले आहे. प्रशासनाने हात आखडता घेतल्याने रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट कायम आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टंचाई कृती आराखडा तयार केला जात आहे. जिल्ह्यातील १ हजार ५९९ गावांपैकी डिसेंबरपर्यंत २0२ गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. तर ८७0 वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल. पहिल्या टप्प्यात टँकरसाठीचा खर्च ५ कोटी १३ लाखांच्या घरात जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येत्या जूनपर्यंत सुमारे ६५0 गावे आणि २ हजार ३0२ वाड्या टँकरवर अवलंबून असणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनवारांच्या चार्‍याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यात काही दीर्घकालीन योजनादेखील प्रशासनाकडून राबविल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
 
पारनेर३१ पंचनामाच्या सूचना
■ नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून कृषी विभागासह तहसीलदार आणि तलाठय़ांना करण्यात आल्या आहेत. डिसेंबरपर्यंत
■ गावे- २0२, वाड्या- ८७0
जानेवारी ते मार्च
■ गावे-४९७, वाड्या- १,७३0 
एप्रिल ते जून
■ गावे- ७५0, वाड्या- २,३0२ अहमदनगर: जिल्ह्यातील १५ हजार ५९९ गावांपैकी खरीप पिकाची पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणारी तब्बल ३0५ गावे आहेत.