शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अंत पाहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST

कोपरगाव : नाशिक जलसंपदा विभागाने रबी हंगामातील आवर्तनाच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे कांदा व गहू या पिकांना एका ...

कोपरगाव : नाशिक जलसंपदा विभागाने रबी हंगामातील आवर्तनाच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे कांदा व गहू या पिकांना एका पाण्याची गरज असताना ते वेळेवर मिळाले नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधींनी नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण पाण्याच्या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे, तसेच जलसंपदा खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे.

कोल्हे म्हणाल्या, मागील वर्षी चांगला पाऊस झाला. धरणेही पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने शेतकरी बांधवांनी उसाची व फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. पाटबंधारे खात्याकडून उन्हाळ्यात किमान तीन आवर्तने मिळतीलच अशी अपेक्षा शेतकरी बांधवांना होती. एप्रिल महिना सुरू होऊनदेखील आवर्तनाच्या तारखा पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या नाहीत. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला, तसेच उष्णतेचे प्रमाण वाढल्याने सध्या पिकांनादेखील पाण्याची खूपच गरज आहे. उभे पीक हे डोळ्यासमोर जळत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे. १५ एप्रिलला उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. आवर्तन सोडून १५ दिवस झाले तरी शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही पाणी पोहोचलेले नाही. सर्वांना कालव्याच्या माध्यमातून दिसत असलेले पाणी मुरते तरी कुठे? याचा शोध घेणे गरजेचे आहे.