शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अंत पाहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST

कोपरगाव : नाशिक जलसंपदा विभागाने रबी हंगामातील आवर्तनाच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे कांदा व गहू या पिकांना एका ...

कोपरगाव : नाशिक जलसंपदा विभागाने रबी हंगामातील आवर्तनाच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे कांदा व गहू या पिकांना एका पाण्याची गरज असताना ते वेळेवर मिळाले नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधींनी नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण पाण्याच्या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे, तसेच जलसंपदा खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे.

कोल्हे म्हणाल्या, मागील वर्षी चांगला पाऊस झाला. धरणेही पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने शेतकरी बांधवांनी उसाची व फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. पाटबंधारे खात्याकडून उन्हाळ्यात किमान तीन आवर्तने मिळतीलच अशी अपेक्षा शेतकरी बांधवांना होती. एप्रिल महिना सुरू होऊनदेखील आवर्तनाच्या तारखा पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या नाहीत. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला, तसेच उष्णतेचे प्रमाण वाढल्याने सध्या पिकांनादेखील पाण्याची खूपच गरज आहे. उभे पीक हे डोळ्यासमोर जळत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे. १५ एप्रिलला उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. आवर्तन सोडून १५ दिवस झाले तरी शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही पाणी पोहोचलेले नाही. सर्वांना कालव्याच्या माध्यमातून दिसत असलेले पाणी मुरते तरी कुठे? याचा शोध घेणे गरजेचे आहे.