शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी की दिवाळे ?

By admin | Updated: October 19, 2014 00:39 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील मतयंत्रात बंद झालेले निकाल रविवारी सकाळी आठपासून धडाधड बाहेर पडणार आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील मतयंत्रात बंद झालेले निकाल रविवारी सकाळी आठपासून धडाधड बाहेर पडणार आहेत. अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीच्या निकालाचे फटाके फुटणार असल्याने मातब्बर नेत्यांसह १३८ उमेदवारांच्या भवितव्याचे दिवे लागणार आहेत. विधानसभेचे निकाल कोणाची दिवाळी साजरी करतात आणि कोणाचे दिवाळे काढतात, हे काही तासांमध्येच स्पष्ट होईल. गत चार दिवसांपासून सुरू असलेली धाकधूकही काही तासांमध्येच एकदाची संपणार आहे.जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातून १३८ उमेदवार आपले नशिब आजमावित आहेत. १५ आॅक्टोबरला त्यांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले. रविवारी (दि.१९)सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होणार असल्याने शिगेला पोहोचलेली उत्कंठा दुपारपर्यंत संपुष्टात येईल. आघाडी आणि युती तुटल्यामुळे कधी नव्हे एवढ्या चुरशीने लढती झाल्या. सहकाराचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात यंदा प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी धसका घेतला आहे, तर नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे भाजपाच्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नरम झालेली काँग्रेस, प्रथमच स्वबळावर निवडणूक लढविणारी शिवसेना यांच्यासमोर त्यांचे गड राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. युती-आघाडीच्या तुटीचा फायदा नेमका कोणाला होणार याचे राजकीय नेत्यांनी बांधलेले आराखडे सुटणार आहेत. जिल्ह्यातील माजी मंत्री मधुकरराव पिचड, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे किल्ले शाबित राहतात की ढासळतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपा आणि शिवसेनेत जाऊन उमेदवारी करणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. उत्तरेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा सरस ठरणार की माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची अंडरग्राऊंड यंत्रणा कोणाचा निकाल लावणार?याचेही चित्र स्पष्ट होईल. बारा आमदारांपैकी किती आमदार आपले वर्चस्व कायम ठेवतात, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील आजी-माजी मंत्री, राज्याचे माजी मंत्री,सर्वच पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी प्रचार सभा घेवून जिल्हा ढवळून काढला. विकासाच्या मुद्द्यांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली. त्याचा जिल्ह्यातील निकालावर प्रभाव राहणार की भाजपाच्या लाटेवर मतदार स्वार होणार,हे काही तासांमध्येच समोर येईल. दिवाळीआधीच निकालाचे फटाके फुटणार असल्याने कार्यकर्तेही दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान सर्व्हेचे आपटबार, सुरसुऱ्यांमुळे दोन-तीन दिवस सोशल मीडियावर चांगलेच मनोरंजन झाले. सर्व्हेचे अंदाज किती खरे होणार? याकडेही मतदारांचे लक्ष लागून आहे.(प्रतिनिधी)