शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ८० टक्के फळांना मिळतो कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 12:07 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये फळे खरेदी करताना व्यापारी सर्रास क्विंटलमागे एक किलोची घट धरतात़ शेतकºयांकडून ही बेकायदेशीर वसुली केली जात आहे़ तसेच वर्गवारी करताना २० टक्के फळांचाच फक्त प्रथम वर्गवारीमध्ये समावेश केला जात असून, उर्वरित ८० टक्के फळांचा समावेश ३ ते ६ या वर्गवारीत होतो़ त्यामुळे ८० टक्के फळांना कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होते़ बाजार समित्यांचे पदाधिकारी, कर्मचारीही व्यापाºयांना पूरक भूमिका घेत असल्याचे दिसते़.

अण्णा नवथर  

अहमदनगर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये फळे खरेदी करताना व्यापारी सर्रास क्विंटलमागे एक किलोची घट धरतात़ शेतकºयांकडून ही बेकायदेशीर वसुली केली जात आहे़ तसेच वर्गवारी करताना २० टक्के फळांचाच फक्त प्रथम वर्गवारीमध्ये समावेश केला जात असून, उर्वरित ८० टक्के फळांचा समावेश ३ ते ६ या वर्गवारीत होतो़ त्यामुळे ८० टक्के फळांना कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होते़ बाजार समित्यांचे पदाधिकारी, कर्मचारीही व्यापाºयांना पूरक भूमिका घेत असल्याचे दिसते़.

नगर जिल्ह्यात संत्री, लिंबू, डाळिंब, द्राक्षे, कलिंगड, चिकू, पेरू, आंबा या फळांचे सर्वाधिक उत्पादन होते़ राहाता बाजार समितीत डाळिंब, नगर बाजार समिती संत्री आणि श्रीगोंद्यात लिंबाची मोठ्या प्रमाणावर खरेदी- विक्री होते़  नगर जिल्ह्यात फळांचे मोठे मार्केट नसल्याने शेतकरी सोलापूर, पंढरपूर बाजार समितीत फळे विक्रीसाठी घेऊन जातात़ पूर्वी फळांच्या विक्रीवर ८ ते १० टक्के कमिशन आकारले जात होते़ ही पध्दत सरकारने बंद केली़ परंतु, शेतकरी वाहतूक भाडे देण्यासाठी उचल घेतात़ त्यातून २ टक्के कमिशन काही बाजार समित्या आकारतात़ यावर कुणाचाही अंकुश नाही़ याशिवाय क्विंटलमागे १ किलोची घट बेकायदेशीररित्या धरली जाते़ एक किलोचे पैसे शेतकºयांना कमी दिले जातात़विशेष म्हणजे शेतकºयाने ५० किलो फळे जरी बाजार समितीत विक्रीसाठी नेले तरी त्यातही १ किलोची घट धरून पट्टी शेतकºयांच्या हातात टेकविली जात आहे़ शेतकºयांनी यावर आवाज उठवूनही बाजार समित्या जाणिवपूर्वक त्याकडे डोळेझाक करीत आहेत़.

फळ विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन गेल्यानंतर तिथे फळांची वर्गवारी केली जाते़ फळांची वर्गवारी करताना शेतकºयांचे हित लक्षात घेतले जात नाही़  हमाल व व्यापाºयांचे लागेबांधे असल्याने ते व्यापाºयांचे हित पाहून वर्गवारी करतात़ त्यामुळे २० टक्के मालाला चांगला भाव मिळतो़ परंतु, उर्वरित ८० टक्के माल कमी दराने विकला जातो़ संत्रीचा प्रति किलो ८० रुपयांनी लिलाव झाल्यास सरासरी भाव ४० रुपये मिळतो़ फळांच्या वर्गवारीमुळे शेतकºयांना एकसारखा भाव मिळत नाही़ त्यामुळे शेतकºयांचा तोटा होतो़.

 

बांधावर विक्री करतानाही शेतकºयांची फसवणूक४बहुतांश शेतकरी शेतातच व्यापाºयांना फळांची विक्री करतात़ ही खरेदी करतानाही १ क्विंटलमागे ५ किलोची घट गृहीत धरूनच शेतकºयांना पैसे दिले जातात़ बांधावर खरेदी-विक्रीत घट धरणे हा अलिखित नियमच झाला आहे़ बांधावरील खरेदी- विक्रीत बºयाचवेळा व्यापारी चांगला माल घेऊन जातात़ उर्वरित माल नेत नाहीत़ फळांची वर्गवारी करून खरेदी केली जात असल्याने शेतकºयांचा तोटा होतो़.

शीतगृहे नसल्याने शेतकºयांची अडचण४फळांचे उत्पादन जास्त झाल्यास ते साठवून ठेवण्याची व्यवस्था नाही़ सरकारकडून तशी सुविधा उपलब्ध केली नाही़ खासगी संस्थांनी शीतगृहे उभारलेले आहेत़ परंतु, त्याचे दर शेतकºयांना परवडणारे नाही़ त्यामुळे मिळेल त्या भावात फळे विकावी लागतात़.

----------

फळांची खरेदी करताना क्विंटलमागे १ किलोची घट धरणे, हे कोणत्याही कायद्यात नाही़ परंतु, बाजार समित्यांकडून अधिकृतरित्या १ किलोची घट धरली जाते़ तसेच वर्गवारी करताना व्यापाºयांचे हित लक्षात घेतले जात असून, २० टक्के फळांना चांगला भाव मिळतो़ उर्वरित फळांना कमी भाव मिळतो़   

 -रमेश ठोंबरे, फळ उत्पादक     शेतकरी, तांदळी वडगाव

----------------

लिंबाचे उत्पादन श्रीगोंदा तालुक्यात जास्त आहे़ तिथे लिंबाचे लिलाव होतात़ डाळिंबाचे लिलाव राहाता बाजार समितीत होतात़ शेतकºयांची फसवणूक झाल्यास आडत्यांना २४ तासात पैसे शेतकºयांना देणे बंधनकारक आहे़    -थोरवे, जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरfruitsफळे