शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ८० टक्के फळांना मिळतो कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 12:07 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये फळे खरेदी करताना व्यापारी सर्रास क्विंटलमागे एक किलोची घट धरतात़ शेतकºयांकडून ही बेकायदेशीर वसुली केली जात आहे़ तसेच वर्गवारी करताना २० टक्के फळांचाच फक्त प्रथम वर्गवारीमध्ये समावेश केला जात असून, उर्वरित ८० टक्के फळांचा समावेश ३ ते ६ या वर्गवारीत होतो़ त्यामुळे ८० टक्के फळांना कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होते़ बाजार समित्यांचे पदाधिकारी, कर्मचारीही व्यापाºयांना पूरक भूमिका घेत असल्याचे दिसते़.

अण्णा नवथर  

अहमदनगर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये फळे खरेदी करताना व्यापारी सर्रास क्विंटलमागे एक किलोची घट धरतात़ शेतकºयांकडून ही बेकायदेशीर वसुली केली जात आहे़ तसेच वर्गवारी करताना २० टक्के फळांचाच फक्त प्रथम वर्गवारीमध्ये समावेश केला जात असून, उर्वरित ८० टक्के फळांचा समावेश ३ ते ६ या वर्गवारीत होतो़ त्यामुळे ८० टक्के फळांना कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होते़ बाजार समित्यांचे पदाधिकारी, कर्मचारीही व्यापाºयांना पूरक भूमिका घेत असल्याचे दिसते़.

नगर जिल्ह्यात संत्री, लिंबू, डाळिंब, द्राक्षे, कलिंगड, चिकू, पेरू, आंबा या फळांचे सर्वाधिक उत्पादन होते़ राहाता बाजार समितीत डाळिंब, नगर बाजार समिती संत्री आणि श्रीगोंद्यात लिंबाची मोठ्या प्रमाणावर खरेदी- विक्री होते़  नगर जिल्ह्यात फळांचे मोठे मार्केट नसल्याने शेतकरी सोलापूर, पंढरपूर बाजार समितीत फळे विक्रीसाठी घेऊन जातात़ पूर्वी फळांच्या विक्रीवर ८ ते १० टक्के कमिशन आकारले जात होते़ ही पध्दत सरकारने बंद केली़ परंतु, शेतकरी वाहतूक भाडे देण्यासाठी उचल घेतात़ त्यातून २ टक्के कमिशन काही बाजार समित्या आकारतात़ यावर कुणाचाही अंकुश नाही़ याशिवाय क्विंटलमागे १ किलोची घट बेकायदेशीररित्या धरली जाते़ एक किलोचे पैसे शेतकºयांना कमी दिले जातात़विशेष म्हणजे शेतकºयाने ५० किलो फळे जरी बाजार समितीत विक्रीसाठी नेले तरी त्यातही १ किलोची घट धरून पट्टी शेतकºयांच्या हातात टेकविली जात आहे़ शेतकºयांनी यावर आवाज उठवूनही बाजार समित्या जाणिवपूर्वक त्याकडे डोळेझाक करीत आहेत़.

फळ विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन गेल्यानंतर तिथे फळांची वर्गवारी केली जाते़ फळांची वर्गवारी करताना शेतकºयांचे हित लक्षात घेतले जात नाही़  हमाल व व्यापाºयांचे लागेबांधे असल्याने ते व्यापाºयांचे हित पाहून वर्गवारी करतात़ त्यामुळे २० टक्के मालाला चांगला भाव मिळतो़ परंतु, उर्वरित ८० टक्के माल कमी दराने विकला जातो़ संत्रीचा प्रति किलो ८० रुपयांनी लिलाव झाल्यास सरासरी भाव ४० रुपये मिळतो़ फळांच्या वर्गवारीमुळे शेतकºयांना एकसारखा भाव मिळत नाही़ त्यामुळे शेतकºयांचा तोटा होतो़.

 

बांधावर विक्री करतानाही शेतकºयांची फसवणूक४बहुतांश शेतकरी शेतातच व्यापाºयांना फळांची विक्री करतात़ ही खरेदी करतानाही १ क्विंटलमागे ५ किलोची घट गृहीत धरूनच शेतकºयांना पैसे दिले जातात़ बांधावर खरेदी-विक्रीत घट धरणे हा अलिखित नियमच झाला आहे़ बांधावरील खरेदी- विक्रीत बºयाचवेळा व्यापारी चांगला माल घेऊन जातात़ उर्वरित माल नेत नाहीत़ फळांची वर्गवारी करून खरेदी केली जात असल्याने शेतकºयांचा तोटा होतो़.

शीतगृहे नसल्याने शेतकºयांची अडचण४फळांचे उत्पादन जास्त झाल्यास ते साठवून ठेवण्याची व्यवस्था नाही़ सरकारकडून तशी सुविधा उपलब्ध केली नाही़ खासगी संस्थांनी शीतगृहे उभारलेले आहेत़ परंतु, त्याचे दर शेतकºयांना परवडणारे नाही़ त्यामुळे मिळेल त्या भावात फळे विकावी लागतात़.

----------

फळांची खरेदी करताना क्विंटलमागे १ किलोची घट धरणे, हे कोणत्याही कायद्यात नाही़ परंतु, बाजार समित्यांकडून अधिकृतरित्या १ किलोची घट धरली जाते़ तसेच वर्गवारी करताना व्यापाºयांचे हित लक्षात घेतले जात असून, २० टक्के फळांना चांगला भाव मिळतो़ उर्वरित फळांना कमी भाव मिळतो़   

 -रमेश ठोंबरे, फळ उत्पादक     शेतकरी, तांदळी वडगाव

----------------

लिंबाचे उत्पादन श्रीगोंदा तालुक्यात जास्त आहे़ तिथे लिंबाचे लिलाव होतात़ डाळिंबाचे लिलाव राहाता बाजार समितीत होतात़ शेतकºयांची फसवणूक झाल्यास आडत्यांना २४ तासात पैसे शेतकºयांना देणे बंधनकारक आहे़    -थोरवे, जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरfruitsफळे