शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कुकडीचं पाणी पुणे जिल्ह्यात खेचण्यासाठी दिलीप वळसे आक्रमक, आज मंत्रालयात बैठक; नगर जिल्ह्यातील नेते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 11:00 IST

या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचा अहवाल शासनास दोन दिवसात शासनाला पाठवावा असे नमुद करण्यात आले आहे.

बाळासाहेब काकडे 

श्रीगोंदा (जि. अहमदनगर):  कुकडी प्रकल्पातील पाणी आंबेगाव, शिरुर तालुक्यात जास्तीत जास्त खेचण्यासाठी आमदार दिलीप वळसे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज दि. 11 रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली आहे. या बैठकीपासून इतर लोकप्रतिनिधी यांना दुर ठेवण्यात आले आहे.

या बैठकीत होणाऱ्या निर्णयाचा अहवाल शासनास दोन दिवसात शासनाला पाठवावा असे नमुद करण्यात आले आहे. या बैठकीत डिंबे माणिकडोह प्रकल्प बोगदा तळपृष्ठ निश्चित होईपर्यत चतुर्थ सुधारीत विकास आखाड्यात समावेश करु नये. डिंबे धरणाखालील कळमजाई व म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनांचा कुकडी प्रकल्पात समावेश करावा, आंबेगाव, शिरुर तालुक्याचा जल नियोजनाचा वाटा कायम ठेवावा, डिंबे डावा कालवा दुरुस्तीसाठी 80 कोटीचा निधी तातडीने मंजुर करावा, आंबेगाव तालुक्यात नदीद्वारे बंधाऱ्यात कायम पाणी सोडावे या अशा मागण्यांवर या बैठकीत  चर्चा होणार आहे. 

अहमदनगर, सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. यासाठी अनेक वर्षापासून लढा चालू आहे. यावर शासन ठोस भुमिका घेत नाही. नगर- सोलापूर जिल्ह्य़ातील शेतकरी कुकडीच्या पाण्यासाठी आशावादी आहेत. अशा परिस्थितीत दिलीप वळसे यांनी आपल्या पोळीवर तुप ओढण्यासाठी आक्रमक भुमिका घेतली आहे. डिंबे- माणिकडोह बोगद्याचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोडतील आशा निर्माण झाली असताना वळसेंनी खो देण्यास सुरुवात केली. यावर  कुकडी लाभक्षेत्रातील  जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि करमाळा तालुक्याचे लोकप्रतिनिधी काय भुमिका घेतात याकडे लक्ष राहणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलWaterपाणी