शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

दिलीप गांधी खासदार नव्हे ‘खावदार’ : अनिल राठोड यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 11:10 IST

उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले नाही, की हत्याकांडाच्या घटनेचा निषेधही केला नाही. यासाठी त्यांना नेमकी कोणाची भीती आहे? असा सवाल शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

अहमदनगर : उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले नाही, की हत्याकांडाच्या घटनेचा निषेधही केला नाही. यासाठी त्यांना नेमकी कोणाची भीती आहे? असा सवाल शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगर येथील पत्रकार परिषदेत भाजप सरकार निकम्मे असून हत्याकांडांच्या घटनेमुळे नगरचा बिहार झाल्याची टीका केली होती. त्यावर खासदार गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे हे नगरची बदनामी करीत असून, शिवसेनेकडे विकासाचा अजेंडा नसल्याने शिवसेनाच निकम्मी असल्याचा टोला लगावला होता. त्याचा राठोड यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. राठोड म्हणाले, गांधी यांच्यावरही खंडणी, अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनाही लवकरच पिंजºयात जावे लागेल.केडगाव हत्याकांडाबाबत बोलायला त्यांना २० दिवसांनंतर जाग कशी आली? खासदारांच्या पुत्राची एलईडीची कंपनी आहे. हेच बोगस दिवे शहरात बसविले जात आहेत. एका दिवसात ते बंद पडत असून, केवळ त्यांची खाऊगिरी सुरू आहे. त्यांना शिवसेनेसोबत युती नको आहे, मात्र आम्हालाच गांधी यांच्यासोबत युती नको आहे. खºया भाजपसोबत आम्ही आहोत. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो. गांधी हे भाजपचे नव्हे, तर केवळ छिंदम गटाचे आहेत. काँग्रेसचा उमेदवार विशाल कोतकर निवडून यावा, यासाठीच त्यांनी निवडणुकीतून पळ काढला. कोतकर हेकदाचित गांधी यांचे सावत्र सोयरे असावेत. भैरवनाथ पतसंस्थेचे त्यांनी कर्ज घेतले, यावरून ते सिद्ध होते. खासदारांनी गांधी या आडनावालाच कलंक लावला. महापालिकेच्या फेज टू बाबत त्यांनी टीका केली. मात्र यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी या योजनेत घोटाळे केले, त्यावेळी त्यांची बोलायची हिंमत का झाली नाही? असा सवालही राठोड यांनी केला.

दिलीप गांधी यांचे डिपॉझिट जप्त होईलकेडगावच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. आता लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तर दिलीप गांधी यांचे डिपॉझिट जप्त होईल. आतापर्यंत शिवसेना सोबत होती म्हणूनच ते तीनवेळा खासदार झाले. शिवाजी कर्डिले विरुद्ध दिलीप गांधी अशी निवडणूक झाली, त्यावेळी आपले नाते भगव्याशी असल्याचे सांगत गांधी यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे माझे सोयरे कोण आहेत, हे गांधी यांनी सांगू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी गांधी यांचा समाचार घेतला. त्यामुळे लोकसभेचे तिकीट मिळाले तर गांधी हे चौथ्या क्रमांकांवर राहतील. शीला शिंदे महापौर असताना महापालिकेच्या पाणीयोजनांसाठी शिर्डीचे तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पाठपुरावा केल्यामुळे महापालिकेला निधी मिळाला. त्यामुळे गांधी यांनी निधी आणल्याची टिमकी वाजवू नये, असे प्रा. गाडे म्हणाले.गांधींनी कर्ज थकवून ठेवीदारांची वाट लावलीभाई रायसोयी पतसंस्था, रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे कोट्यवधी रुपयांचे खासदार गांधी यांनी कर्ज घेतले. हे कर्ज त्यांनी परत केले नाही. त्यामुळे या पतसंस्थांची वाट लागली. याला खासदार गांधी हेच जबाबदार आहेत. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. केडगावची भैरवनाथ पतसंस्था खासदारांना नेहमीच कर्ज देते. त्यामुळे त्यांचे कोतकरांशी लागेबांधे आहेत, हेच स्पष्ट होते, असा आरोप राठोड यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAnil Rathodअनिल राठोडDilip Gandhiखा. दिलीप गांधीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड