शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

दिलीप गांधी खासदार नव्हे ‘खावदार’ : अनिल राठोड यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 11:10 IST

उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले नाही, की हत्याकांडाच्या घटनेचा निषेधही केला नाही. यासाठी त्यांना नेमकी कोणाची भीती आहे? असा सवाल शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

अहमदनगर : उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले नाही, की हत्याकांडाच्या घटनेचा निषेधही केला नाही. यासाठी त्यांना नेमकी कोणाची भीती आहे? असा सवाल शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगर येथील पत्रकार परिषदेत भाजप सरकार निकम्मे असून हत्याकांडांच्या घटनेमुळे नगरचा बिहार झाल्याची टीका केली होती. त्यावर खासदार गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे हे नगरची बदनामी करीत असून, शिवसेनेकडे विकासाचा अजेंडा नसल्याने शिवसेनाच निकम्मी असल्याचा टोला लगावला होता. त्याचा राठोड यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. राठोड म्हणाले, गांधी यांच्यावरही खंडणी, अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनाही लवकरच पिंजºयात जावे लागेल.केडगाव हत्याकांडाबाबत बोलायला त्यांना २० दिवसांनंतर जाग कशी आली? खासदारांच्या पुत्राची एलईडीची कंपनी आहे. हेच बोगस दिवे शहरात बसविले जात आहेत. एका दिवसात ते बंद पडत असून, केवळ त्यांची खाऊगिरी सुरू आहे. त्यांना शिवसेनेसोबत युती नको आहे, मात्र आम्हालाच गांधी यांच्यासोबत युती नको आहे. खºया भाजपसोबत आम्ही आहोत. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो. गांधी हे भाजपचे नव्हे, तर केवळ छिंदम गटाचे आहेत. काँग्रेसचा उमेदवार विशाल कोतकर निवडून यावा, यासाठीच त्यांनी निवडणुकीतून पळ काढला. कोतकर हेकदाचित गांधी यांचे सावत्र सोयरे असावेत. भैरवनाथ पतसंस्थेचे त्यांनी कर्ज घेतले, यावरून ते सिद्ध होते. खासदारांनी गांधी या आडनावालाच कलंक लावला. महापालिकेच्या फेज टू बाबत त्यांनी टीका केली. मात्र यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी या योजनेत घोटाळे केले, त्यावेळी त्यांची बोलायची हिंमत का झाली नाही? असा सवालही राठोड यांनी केला.

दिलीप गांधी यांचे डिपॉझिट जप्त होईलकेडगावच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. आता लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तर दिलीप गांधी यांचे डिपॉझिट जप्त होईल. आतापर्यंत शिवसेना सोबत होती म्हणूनच ते तीनवेळा खासदार झाले. शिवाजी कर्डिले विरुद्ध दिलीप गांधी अशी निवडणूक झाली, त्यावेळी आपले नाते भगव्याशी असल्याचे सांगत गांधी यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे माझे सोयरे कोण आहेत, हे गांधी यांनी सांगू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी गांधी यांचा समाचार घेतला. त्यामुळे लोकसभेचे तिकीट मिळाले तर गांधी हे चौथ्या क्रमांकांवर राहतील. शीला शिंदे महापौर असताना महापालिकेच्या पाणीयोजनांसाठी शिर्डीचे तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पाठपुरावा केल्यामुळे महापालिकेला निधी मिळाला. त्यामुळे गांधी यांनी निधी आणल्याची टिमकी वाजवू नये, असे प्रा. गाडे म्हणाले.गांधींनी कर्ज थकवून ठेवीदारांची वाट लावलीभाई रायसोयी पतसंस्था, रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे कोट्यवधी रुपयांचे खासदार गांधी यांनी कर्ज घेतले. हे कर्ज त्यांनी परत केले नाही. त्यामुळे या पतसंस्थांची वाट लागली. याला खासदार गांधी हेच जबाबदार आहेत. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. केडगावची भैरवनाथ पतसंस्था खासदारांना नेहमीच कर्ज देते. त्यामुळे त्यांचे कोतकरांशी लागेबांधे आहेत, हेच स्पष्ट होते, असा आरोप राठोड यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAnil Rathodअनिल राठोडDilip Gandhiखा. दिलीप गांधीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड