शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

दिलीप गांधी खासदार नव्हे ‘खावदार’ : अनिल राठोड यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 11:10 IST

उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले नाही, की हत्याकांडाच्या घटनेचा निषेधही केला नाही. यासाठी त्यांना नेमकी कोणाची भीती आहे? असा सवाल शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

अहमदनगर : उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले नाही, की हत्याकांडाच्या घटनेचा निषेधही केला नाही. यासाठी त्यांना नेमकी कोणाची भीती आहे? असा सवाल शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगर येथील पत्रकार परिषदेत भाजप सरकार निकम्मे असून हत्याकांडांच्या घटनेमुळे नगरचा बिहार झाल्याची टीका केली होती. त्यावर खासदार गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे हे नगरची बदनामी करीत असून, शिवसेनेकडे विकासाचा अजेंडा नसल्याने शिवसेनाच निकम्मी असल्याचा टोला लगावला होता. त्याचा राठोड यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. राठोड म्हणाले, गांधी यांच्यावरही खंडणी, अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनाही लवकरच पिंजºयात जावे लागेल.केडगाव हत्याकांडाबाबत बोलायला त्यांना २० दिवसांनंतर जाग कशी आली? खासदारांच्या पुत्राची एलईडीची कंपनी आहे. हेच बोगस दिवे शहरात बसविले जात आहेत. एका दिवसात ते बंद पडत असून, केवळ त्यांची खाऊगिरी सुरू आहे. त्यांना शिवसेनेसोबत युती नको आहे, मात्र आम्हालाच गांधी यांच्यासोबत युती नको आहे. खºया भाजपसोबत आम्ही आहोत. युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो. गांधी हे भाजपचे नव्हे, तर केवळ छिंदम गटाचे आहेत. काँग्रेसचा उमेदवार विशाल कोतकर निवडून यावा, यासाठीच त्यांनी निवडणुकीतून पळ काढला. कोतकर हेकदाचित गांधी यांचे सावत्र सोयरे असावेत. भैरवनाथ पतसंस्थेचे त्यांनी कर्ज घेतले, यावरून ते सिद्ध होते. खासदारांनी गांधी या आडनावालाच कलंक लावला. महापालिकेच्या फेज टू बाबत त्यांनी टीका केली. मात्र यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी या योजनेत घोटाळे केले, त्यावेळी त्यांची बोलायची हिंमत का झाली नाही? असा सवालही राठोड यांनी केला.

दिलीप गांधी यांचे डिपॉझिट जप्त होईलकेडगावच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. आता लोकसभा निवडणुकीला उभे राहिले तर दिलीप गांधी यांचे डिपॉझिट जप्त होईल. आतापर्यंत शिवसेना सोबत होती म्हणूनच ते तीनवेळा खासदार झाले. शिवाजी कर्डिले विरुद्ध दिलीप गांधी अशी निवडणूक झाली, त्यावेळी आपले नाते भगव्याशी असल्याचे सांगत गांधी यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे माझे सोयरे कोण आहेत, हे गांधी यांनी सांगू नये, अशा शब्दांत शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी गांधी यांचा समाचार घेतला. त्यामुळे लोकसभेचे तिकीट मिळाले तर गांधी हे चौथ्या क्रमांकांवर राहतील. शीला शिंदे महापौर असताना महापालिकेच्या पाणीयोजनांसाठी शिर्डीचे तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पाठपुरावा केल्यामुळे महापालिकेला निधी मिळाला. त्यामुळे गांधी यांनी निधी आणल्याची टिमकी वाजवू नये, असे प्रा. गाडे म्हणाले.गांधींनी कर्ज थकवून ठेवीदारांची वाट लावलीभाई रायसोयी पतसंस्था, रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे कोट्यवधी रुपयांचे खासदार गांधी यांनी कर्ज घेतले. हे कर्ज त्यांनी परत केले नाही. त्यामुळे या पतसंस्थांची वाट लागली. याला खासदार गांधी हेच जबाबदार आहेत. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. केडगावची भैरवनाथ पतसंस्था खासदारांना नेहमीच कर्ज देते. त्यामुळे त्यांचे कोतकरांशी लागेबांधे आहेत, हेच स्पष्ट होते, असा आरोप राठोड यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAnil Rathodअनिल राठोडDilip Gandhiखा. दिलीप गांधीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड