शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दहिगाव बंधा-यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी; पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:53 IST

नगर तालुक्यातील दहिगाव येथे असणा-या सीना नदीच्या पात्रात गावक-यांनी कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधला. याची साठवण क्षमता जवळपास १ टी.एम.सी. इतकी आहे. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या बंधा-यात चांगला पाणी साठा झाला होता. दुष्काळी असणा-या या गावात कधी नव्हे तो इतका पाणी साठा झाल्याने गावात आनंदाचे वातावरण होते.

योगेश गुंडकेडगाव : नगर तालुक्यातील दहिगाव येथील बंधा-याचे दरवाजे बदलण्यासाठी शासनाकडून २३ लाख रुपयांचे नवे दरवाजे आले. मात्र जुने दरवाजे पाटबंधारे विभागाने वेळेत न बदलल्याने या बंधा-याला गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरु आहे. गावक-यांनी जलयुक्त शिवाराचे पाहिलेले स्वप्न आता बंधा-याच्या पाण्यात वाहून जाताना पाहण्याची दुर्दैवी वेळ दहिगावकरांवर आली आहे.नगर तालुक्यातील दहिगाव येथे असणा-या सीना नदीच्या पात्रात गावक-यांनी कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधला. याची साठवण क्षमता जवळपास १ टी.एम.सी. इतकी आहे. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या बंधा-यात चांगला पाणी साठा झाला होता. दुष्काळी असणा-या या गावात कधी नव्हे तो इतका पाणी साठा झाल्याने गावात आनंदाचे वातावरण होते. या गावाचा समावेश जलयुक्त योजनेत करण्यात आला आहे. या योजनेतून याच बंधा-याचे जुने दरवाजे बदलून नवे दरवाजे टाकण्यात येणार होते. त्यासाठी शासनाचा २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झालो. याच निधीतून या बंधाºयासाठी नवे दरवाजे गावात दाखल झाले. काही दरवाजे येणे बाकी होते.सरपंच मधुकर म्हस्के व गावक-यांनी जुने दरवाजे काढून नवे दरवाजे बसवण्यात यावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र जुने दरवाजे न काढताच नवे अर्धवट दरवाजे बसवण्याचे काम सुरु झाले़ त्यामुळे या बंधा-यातील पाण्याला गळती सुरु झाली. इतके दिवस साठवलेले लाखो लिटर पाणी आता वाहून जात आहे. बंधा-याचे खालील दरवाजातून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. याबाबत गावक-यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली़ मात्र, उपयोग झाला नाही.गावात असणा-या या बंधा-यात जवळपास १ टी. एम. सी. इतका पाणी साठा आहे. आता हे पाणी वाहून जात आहे. बंधा-यातील पाण्यामुळे गावाची दुष्काळातून सुटका होईल, असे वाटत असतानाच बंधा-याला गळती लागली अन् लाखो लीटर पाणी वाहून जाऊ लागले आहे.

गावातील बंधा-याचे दरवाजे बदलण्यासाठी काही नवे दरवाजे बसवण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र जुने दरवाजे काढावेत, अशी अनेकदा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या बंधा-यातील पाण्यामुळे गावाचे शिवार जलमय झाले होते. आता बंधा-याला मोठी गळती सुरु असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.-मधुकर म्हस्के, सरपंच, दहिगाव

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीDamधरण