शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीत मानवतेच्या दरबारी  माणुसकीला कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 14:52 IST

वर्षभरात साईनगरीत तब्बल ८८ व्यक्ती गायब झाल्या आहेत. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  केवळ ऐवढेच नाही तर मानवतेच्या दरबारी माणुसकीला कोलदांडा घालणारे प्रकार सर्रास सुरू आहेत. 

प्रमोद आहेर ।  शिर्डी : वर्षभरात साईनगरीत तब्बल ८८ व्यक्ती गायब झाल्या आहेत. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  केवळ ऐवढेच नाही तर मानवतेच्या दरबारी माणुसकीला कोलदांडा घालणारे प्रकार सर्रास सुरू आहेत. यात गुन्हेगारी व स्वार्थी लोकांबरोबरच शासकीय यत्रंणाही तितक्याच जबाबदार आहेत़भाविकांची पाकीटमारी, वस्तू किंंवा मोबाईलची चोरी होते. चोरीचा तपास करावा लागत. त्यामुळे पोलिसात चोरी ऐवजी हरवल्याची तक्रार करायला सांगितली जाते. त्यासाठीही अनेक तास भाविक पोलीस ठाण्याच्या आवारात तिष्ठत असतो. व्हीआयपींच्या सेवेत चोवीस तास राहणा-या पोलिसांना सामान्य भाविकांची तक्रार ऐकायलाही वेळ नसतो़. काही व्यवसायिक भाविकांची फसवणूक करतात. त्यावर कठोर कारवाई होत नाही. अन्य राज्यात बाहेरील पर्यटकांच्या वाहनांना पोलीस मदत करतात. इथे तपासणीच्या नावाखाली भाविकांना अक्षरश: त्रास दिला जातो़. शिर्डीत हजारो वाहनांद्वारे बेकायदा प्रवाशी वाहतूक होत असतांना त्याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करून भाविकांच्या वाहनाला किरकोळ कारण काढून आर्थिक भुर्दंड दिला जातो़ विशेषत: गुजरातचा भाविक महाराष्ट्राच्या हद्दीत शिरला की शिर्डीत येईपर्यंत महामार्ग पोलीस व नागरी पोलीस ठिकठिकाणी तपासणीच्या नावाखाली त्रास देतात. रस्त्यावरून येणाºया-जाणा-या व्हीआयपी, वरिष्ठ अधिका-यांच्या देखतही हे बिनदिक्कम सुरू असते. शहराची व महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा यातून खराब होते.साईबाबा संस्थानने गेल्या दोन-तीन वर्षात जवळपास पावणे दोनशे कोटी रूपये बाहेर दिले. शिर्डीत मात्र सीसीटीव्ही बसवण्यासाठी देणगीदार शोधले जातात. मंदिर परिसरात पावणे दोनशे कॅमे-यांची गरज आहे. तिथे शंभरच सुरू होते, आता अनेक भक्तांच्या देणगीतून अठ्ठेचाळीस वाढले आहेत. त्यांची क्षमताही सुमार आहे. संस्थान भक्तनिवास, प्रसादालय, रूग्णालये इथे सीसीटीव्हीची मोठी आवश्यकता आहे,  भाविकांचे हरवणे, त्यांना लुबाडणे याच परिसरात होत असते. संस्थान अनेक वर्षापासून हा मुलभूत प्रश्न सोडवू शकले नाही. हा प्रश्न मार्गी लागण्याऐवजी टाईम दर्शनच्या माध्यमातून भाविकाला त्रास व खासगी एजन्सीला धंदा मिळवून देण्यात संस्थानला धन्यता वाटते.अडीच वर्षापूर्वी राज्य शासनाच्या आयटी विभागाने शिर्डीत जवळपास ७४ कोटींचा आराखडा बनवला. त्यात नेमके काय आहे याची स्पष्टता नसल्याने संस्थानने निधी दिला नाही. आता ही रक्कम ९५ कोटीवर गेल्याचे समजते. शहरात स्मार्टसिटी अंतर्गत सीसीटीव्ही बसवायला इतकी रक्कम लागते का? हा सामान्य भाविकच नाही तर संस्थानच्याही आकलना बाहेरचा विषय आहे.शिर्डीकरांनी शहराचा लौकिक वाढवण्यासाठी भाविकांच्या लुटीत सहभागी न होता, भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात केवळ निवेदन देऊन बातमीपुरती समाजसेवा न करता सबंधितांना जाब विचारल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल़.

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरAhmednagarअहमदनगर